जेरुसलेममधील एका प्राचीन भिंतीवरून अरब आणि ज्यू यांच्यातील वातावरण तंग बनले आहे. ज्यू या भिंतीला पूजास्थान मानतात. मात्र, त्यांचा या भिंतीशी काही संबंध नाही असा दावा पॅलेस्टिनी अॅथॉरिटीच्या माहिती खात्याने आपल्या संकेतस्थळावर केला आहे. या विधानामुळे ज्यूंच्या भावना दुखावल्या आहेत. इस्राइल-अरब संघर्षात जेरुसलेमचे स्थान हा अत्यंत वादग्रस्त प्रश्न आहे. ताज्या वादाने त्याचे स्वरूप तीव्र झाले आहे. […]
जर एखादे काम आजच करावयाचे असेल, तर ते उद्यावर कशाला टाकता. ते उद्यावर ढकलू नका. तुम्हीच तुम्हाला आव्हान दिल्यास, तुमच्यातील आळशीपणा दूर पळेल. त्यासाठी तुम्ही तुम्हालाच आव्हान द्या. दिरंगाई हा शब्द तुम्हाला माहित आहे काय? आपण कितीही पध्दतशीर असलो, तरीही हा आपल्या जीवनात हळू-हळू प्रवेश करीतच असतो. आपण जे काही हळू-हळू मिळविलेले असते, त्याची घडी तो […]
भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल. […]
वाहिन्यांचा कल्लोळ एवढा झाला की, यामुळे भारताच्या सांस्कृतिक मनोरंजनाची नुसती खिचडी झालेली आहे, त्यामुळे एखादेवेळी का विरंगुळा म्हणून या इडियट बॉक्सचा उपयोग करुन घेतो म्हटले तरी तो निव्वळ इडियटपणाच ठरतो यात तिळ मात्रही शंका उरली नाही. यात काही अपवाद सोडले अन् मनोरंजन होवू लागेल तर ‘कमर्शिअर ब्रेक’ची आडवी टांग ‘आड’ येते त्यामुळे आता
पुन्हा एकदा खर्या रसिकाने नाट्यगृहे, सिनेमागृहे अथवा वाचनालये किंवा परिसंवाद, व्याख्यानमाला या प्रकाराकडे वळण्याचा विचार करायला हरकत नाही. […]
अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस असीम आनंदाचे ठरतात. दिवाळीत प्रत्येक दिवसाला आख्यायिकांचा आधार आहे. अमावस्येच्या रात्रीचा अंध:कार दूर सारून प्रकाशाच्या वाटा दाखवणारा हा सण ! या निमित्ताने आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा मिळते. […]
दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण मानला जातो. फटाक्यांच्या आतषबाजीने या उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. परंतु, फटाक्यांमुळेमोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण होते. फटाक्यांमधील विषारी रसायनांचा मानवी शरीरावर विपरित परिणाम होतो. मानवाप्रमाणेच जीवसृष्टीलाही धोका पोहोचतो. ही सर्व हानी रोखण्यासाठी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या वापरावर काही मर्यादा आणल्या पाहिजेत. […]
मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगर मराठी आंदोलने होणे हे तसे नवीन नाही. राजकीय लाभासाठी काही तरी भावनात्मक निमित्त शोधण्याचे प्रयत्न राजकारणी करीत असतात आणि मुंबईसारखे महानगर त्यासाठी सुपीक भूमीसारखे असते. […]
गरीबांसाठी घरबांधणीच्या संबंधात काहीजणांचा उंच इमारतींच्या बांधकामाला आक्षेप असतो. परंतु मुंबईसारख्या शहरांमध्ये जमिनीचा तुटवडा असल्यामुळे आणि जागांचे भाव प्रचंड असल्यामुळे गरजू लोकांना घरे मिळवून द्यायची असतील तर बैठ्या घरांची रचना पुरेशी ठरत नाही. तीन ते सात मजली इमारती बांधणे आवश्यक ठरते. […]