ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका….दोन तुल्यबळ संघ. पण त्यांच्या सामन्याला कोणीच प्रायोजक नाही? जाहिरातदार नाही? काय दिवस आलेत? आमच्याकडे अगदी कॅनडा किंवा बांगलादेश सारखा फडतुस संघ जरी खेळत असला तरी ओव्हरचा शेवटचा बॉल कधी एकदा पडतोय आणि जाहिरात सुरु होतेय असं चित्र असतं. बॉलर धावत जातानासुद्धा अर्धा स्क्रीन जाहिरातीनेच व्यापलेला असतो. एखादा खेळाडू आउट झाला की लागलीच जाहिरात. […]
मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे मुंबईला प्रगत बनविण्यासाठी. फारच कमी जणांना माहिती असेल की मुंबई मराठी माणसाने विकत घेतली आहे. होय, हे खरे आहे. संयुक्त महाराष्ट्र जन्माला येण्यासाठी गुजरातला महाराष्ट्राने कोट्यवधी रुपये दिले आहेत. . […]
भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेच्या कारागृहात झाला. सावरकरांच्या हिंदुत्व विचारांचा उगम अंदमानच्या कारागृहात झाला. काय सुंदर योगायोग आहे हा? कारागृहात जन्माला आलेले श्रीकृष्ण आणि सावरकरांचे हिंदुत्ववादी विचार आज आपल्याला संजिवनी देत आहेत. […]
राष्ट्रीय अथवा लोकनेत्यांच्या नावावर, देवी- देवतांच्या नावावर देणग्या उखळल्या जाण्याचा फंडा काही आजचा नाही. अशा निमित्ताने मोठ्या प्रमाणात देणगी गोळा केली जाते. मात्र या देणग्यांचा हिशेब सार्वजिक केला जात नाही. किंवा धर्मादाय आयुक्तास सादर केला जात नाही. […]
शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते. […]
मर्ढेकरांच्या कवितांत प्रतिमांचा वापर मुक्तपणे केलेला आहे. किंबहुना कवितेत प्रतिमांचा वापर ही मर्ढेकरांची मराठी काव्याला देणगी आहे. “पंक्चरली जरि रात्र दिव्यांनी ” ही कविता तशी दुर्बोधच मानली जाते. मर्ढेकरांच्या अशा कवितांची त्या काळात टीकाकार व समीक्षकांकडून खिल्ली उडवण्यात आली होती. व काही कवितांवर अश्लीलतेच्या नावाखाली खटली भरण्यात आला होता. ह्या संदर्भात कवितेतील प्रतिमांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. […]
तोरईचे सूप! आश्चर्य वाटेल. पण ग्रीन सूप या नावाने हे सूप पिण्या साठी मुलांना दिले त्यांना अत्यंत आवडले. हे सूप तोरईचे आहे हे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. कधीही तोरई न खाणारे तोरईची भाजीही आनंदाने खाऊ लागतील तर त्यात नवल नाही. […]
निदान काही काळ तरी लांब जाणं, गिर्यारोहण, निसर्गात मनसोक्त भटकंती, आवडत्याछंदात मन गुंतवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलला आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनू न देणं हा उपाय असल्याचं मनोविकार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मुळात माणूस हेसुद्धा निसर्गाचंच लेकरू. हे हरवलेलं लेकरू पुन्हा निसर्गाकडे परतणार की निसर्गापासून अधिकाधिक दूर जाऊन अखेर सर्वनाश ओढवून घेणार, हे येणारा काळच ठरवील. […]
उत्क्रांतीच्या काळात निसर्गाने प्रजननाच्या बाबतीत पुरुषांच्या- म्हणजे नरांच्या बाजूने थोडे झुकते माप देऊन पुरुषाच्या जबाबदार्या कमी केल्या असतील, पण स्त्री-म्हणजे मादीला यादृष्टीने मिळालेली दुय्यम दर्जाची वागणूक भविष्यात तिला तिच्या अस्तित्वासाठी एक मोठे वरदान ठरू शकते. […]