समाजात स्त्रियांचा सन्मान केला जावा असे कितीही सांगितले जात असले तरीही आपल्या देशात अजून तरी या बाबतीत मध्ययुगीन मानसिकताच दिसत आहे. परवा एकाच दिवशी देशातील विविध न्यायालयांनी बलात्कार आणि खुनाच्या तीन बहुचर्चित गुन्ह्यांमध्ये काही आरोपींना शिक्षा सुनावली तर काहींना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. देवीचे रूप मानली गेलेली स्त्री खरोखरच किती सुरक्षित आहे याचा नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला वेध. […]
गुंतवणुकीवर अधिकाधिक परतावा मिळावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळतो, परंतु त्यात धोकेही असतात. म्हणून ज्येष्ठ नागरिक आणि काही तरुण मंडळीही सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. अशाच काही सुरक्षित गुंतवणूक प्रकारांचा मागोवा. […]
वाढत्या महागाईने हैराण झालेल्या जनतेला आता वाढत्या भेसळीचा सामना करावा लागत आहे. त्यात जीवनावश्यक वस्तू तसेच खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात दूधभेसळीचे मोठे रॅकेट नुकतेच उघडकीस आले. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या अशा रॅकेटमध्ये सहभागी असणार्यांवर कठोर कारवाई होणे दूरच राहिले. अशा गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त लाभत आहे. […]
तंत्रज्ञानात वेगाने प्रगती होत असताना आज प्रगत वाटणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उद्याच जुनी होतात. नवी आणखी प्रगत उत्पादने त्यांची जागा घेण्यास टपलेली असतात. या जीवघेण्या स्पर्धेतही काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनेक वर्षे लोकप्रियता राखून आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण उपकरणांचा मागोवा. […]
भर रस्त्यावर कोणाचीतरी लुट होते. आजूबाजूचा समाज बघून न बघितल्यासारखे करतो आणि सरळ निघून जातो आणि तो मनुष्य मार खाऊन त्याची भरदिवसा लुट होत असते हे आपण ऐकले असेल किव्वा बघितले सुद्धा असेल. मग याला आपण काय म्हणाल समाज भितो का ? घाबरतो का ? […]
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय देऊन सरकारला शाळांची फी निश्चित करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे बर्याच इंग्रजी शाळांनी फी वाढ केली व त्यामुळे पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पण अर्थातच अनेक शाळांनी याला भीक घातली नाही. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पालक पाल्याच्या भवितव्याच्या काळजीने गप्प बसले. पण एकंदरीतच मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. […]
भालजी पेंढारकरांसारख्या नररत्नाच्या पोटी जन्माला आल्यानंतर ‘रारंगढंग’कार प्रभाकर पेंढारकर यांना स्वत:ची कारकीर्द घडवताना नेहमीच एक गडद सावली सांभाळावी लागणार होती. त्यांनी ती लिलया जपत स्वत:चा ठसा उमटवला. त्यांच्या निधनामुळे स्वत:ची वेगळी वाट चोखाळणार्या एका व्यासंगी कादंबरीकाराला मराठी साहित्यविश्व अंतरल्याची हळहळ सतत जाणवत राहील. त्यांच्या स्मृतींना दिलेला उजाळा. […]
भारतीय संसदेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. तरीही या विषयावर अधिकारवाणीने लिहिण्या-बोलण्यासारखे बरेच काही असते. कदाचित म्हणूनच ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांचे ‘द पार्लमेन्टरी सिस्टिम’ हे नवे पुस्तक बरेच काही सांगून जाणारे ठरते. या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात आला. सामान्य माणसाला त्यातून प्रचलित राजकारणाचा नव्याने परिचय होतो. […]