नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

मूर्तीभंजकांची परंपरा…

मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. […]

‘नोटा – बदली’ नंतरचे ‘राज’ बदल ?

८ नोव्हेंबर २०१६ च्या नोटा – बदलिच्या निर्णयाने मोदी सरकार ने धमाका उडवून दिला.  कोणी त्याचे समर्थन करो , कोणी विरोध करो ; पण कोणीही दुर्लक्ष करूच शकणार नाही . ” अशाच स्वरूपाचा तो निर्णय आहे .  या निर्णयांच्या अंमलबजावणीमुळे अक्षरशः सर्वांनाच या ना त्या प्रकारे स्वतःच्या आर्थिक व्यवहारांचा पुनर्विचार करावा लागत आहे . एक प्रकारे […]

जातीधर्माच्या व्यवस्थेचा पगडा आणि धर्म निरपेक्षतेचा मुलामा

जयललिता यांच्या मृत्यू नंतर पुन्हा एकदा भारतीय चेह-या वरचा मुलामा उडाला आहे.जयललिता या ब्राह्मण विरोधी राजकीय पक्षाच्या सर्वेसर्वा होत्या . किंबहुना ब्राह्मण विरोध हाच या पक्षाचा इतिहास आहे. चेन्नईतील उच्च जातीचे लोक केव्हाच हद्दपार झाले आहेत . […]

राष्ट्रवादी काॅंग्रेस भविष्यात बारामती पुरतीच

राज्यभरात गेल्या तीन महिन्यांत मराठा मोर्चाचे वादळ उठले होते. या मराठा मोर्चाचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होईल, असे सरधोपटपणे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाणी पाजू, असं विधान बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत केलं. पण झालं उलटचं. राष्ट्रवादी काँग्रेसनं बारामतीत दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा येथे पराभव झाला […]

देशाचे चित्र बदलत आहे त्याचे कमीतकमी साक्षीदार तरी व्हा

आठ दिवस घरात असलेली रक्कम खात्यावर भरण्यासाठी थांबलो होतो. नोटा बदलून घेण्याची गरज भासली नाही. बँक खाते आहे. त्या खात्यावर रक्कम भरली आणि लगेच बेअरर चेक नि थोडी रक्कम काढून घेतली. बँकेचे कर्मचारी कल्पना करवणार नाही इतके चांगले वागत होते. सगळ्या खाजगी बँकेत हाच अनुभव येतोय असे लोक बोलतात. मध्यम वर्गीय आनंदित !!!! या सर्व ५०० […]

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता

जयललिता उर्फ अम्मा यांचे निधन जयललिता यांची माहिती जन्म. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी तामिळनाडूमधील अय्यंगार ब्राह्मण कुटुंबात जयललिता जन्माला आल्या. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मा.जयललिता नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. कोमलावल्ली (मा.जयललितांचे जुने नाव) जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले. जयललितांच्या आईची दुसरी बहीण अमबुजावल्ली यांनी त्यांना चित्रपटसृष्टीत आणले. सुरुवातीला त्यांनी लहान-लहान ड्रामा […]

बाबासाहेब… फक्त एका समाजाचे

आज इतक्या वर्षांनंतर डाॅ. बाबासाहेब तळागाळात पोहोचले, रुजले. परंतू शेवटी जे सर्वच मोठ्या माणसांचं होतं तेच बाबासाहेब या देव माणसाचंही झालं..बाबासाहेब एक समाजाचे म्हणून ओळखले जायला लागले. जसं, संत नामदेव शिंपी समाजाचे झाले, संत रोहीदास चर्मकार समाजाचे, फुले माळीसमाजाला दिले गेले..! अशी कित्येक उदाहरणं देता येतील. परदेशात असं झालेलं दिसत नाही. मार्टीन ल्युथर किंग किंवा नेल्सन […]

शेंगा आणि टरफलं

लोकमान्य टिळक लहानपणी म्हणाले होते. “मी शेंगा खाल्ल्या नाहीत… मी टरफलं उचलणार नाही” आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा: महात्मा गांधी: “मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलणार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलणार” बाळासाहेब ठाकरे: “यांच्या बापाचा माल आहे काय? शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली […]

काटा रुते कुणा कुणाला ….

मोदी: काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी उद्धव: मज फूलही(कमळ) रुतावे हा दैवयोग आहे ! केजरीवाल: सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ? राहुल गांधी: चिरदाह वेदनेचा मज श्राप हाच आहे ! अजित: काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे मनमोहन: माझे अबोलणेही विपरीत होत आहे ! भुजबळ: हा स्‍नेह, वंचना की, काहीच आकळेना बारामती: आयुष्य ओघळोनी मी […]

1 17 18 19 20 21 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..