नवीन लेखन...

आई-बाबा, आजी-आजोबांकडून ऐकलेल्या या जुन्या गोष्टींचा संग्रह !

हरवलेल्या बॅगचा शोध

आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार […]

संकटांवर मात

जीवन जगताना अनेक अडचणी येत असतात. परंतु अशी कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता त्या अडचणीतून वाट काढत कसे बाहेर जाता येईल याचा शांतचित्ताने व धीराने विचार केला तर अशा संकटावर सहज मात करता येऊ शकते. या संदर्भात प्रसिद्ध तत्त्ववेत्ते टॉलस्टॉय यांच्यासंबंधी सांगितली जाणारी हकिकत मोठी मनोरंजक आहे. टॉलस्टॉय हे स्वभावाने अतिशय मिश्कील व प्रेमळ […]

…आणि बिरबल परतला

अकबर आणि बिरबल यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अकबर बादशहा असूनही बिरबलची आणि त्याची खूप चांगली मैत्री होती. अनेकदा बिरबलबरोबरच्या सहवासात आपण बादशहा आहोत हे अकबर विसरून जात असे. त्यामुळे दरबारातील अनेक मंडळींना उभयतांची ही मैत्री खटकायची. बिरबलला अकबरपासून कसे दूर करता येईल यासाठी काही जणांचे सारखे प्रयत्न चालू असत. एकदा असेच कोणीतरी बिरबलबद्दल अकबर बादशहाचे […]

उत्साह आणि कृती

काही लोक अतिशय उत्साही असतात. उत्साहाच्या भरात ते वेगवेगळ्या वल्गना करतात. मात्र प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की, त्यांचा उत्साह मावळू लागतो. नीलेश आणि ज्ञानेश हे दोघे मित्र खूपच उत्साही होते. प्रत्येक गोष्टीत ते इतके उत्साहाने बोलत की, ऐकणार्‍यांवर त्यांचा खूपच प्रभाव पडत असे. उत्साहाच्या बाबतीत दोघेही एकमेकाला हार जात नव्हते.दिवाळीचे दिवस जवळ आले होते. दिवाळीचे आणि […]

असाध्य ते साध्य

जीवनात कोणतेही आव्हान स्वीकारायचे असेल, तर त्यासाठी जिद्द व चिकाटी हवी. शिवाय समोर आलेले कोणतेही आव्हान आपण स्वीकारूच व त्यात यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास असला तर कोणतेही असाध्य काम साध्य व्हायला वेळ लागत नाही. एकदा एका राजाला एका विशेष कामासाठी चांगल्या कर्तबगार अधिकार्‍याची गरज होती. असा अधिकारी परीक्षा घेऊनच त्याला निवडायचा होता. त्यासाठी त्याने राजवाड्यासमोरील भव्य […]

देखल्या देवाला दंडवत

एका गावात एक कुंभार राहात होता. तो अतिशय सुबक मूर्ती बनवायचा. त्यामुळे दूरच्या गावांहूनही त्याच्याकडे बरीच गिर्‍हाईके येत असत. गणेशोत्सव जवळ आला होता. त्यामुळे कुंभाराकडे गणपतीच्या मूर्तीसाठी बरीच मागणी होती. एकेक मूर्ती तयार करून तो गिर्‍हाईकांकडे घेऊन जात असे. कुंभाराने गणेशाची एक अशीच मोठी सुबक मूर्ती बनविली व आपल्या गाढवावर लादून तो ज्याने ऑर्डर दिली त्याच्या […]

ज्याचे अन्न त्याला द्या !

संत गाडगेबाबा खानदेशात फिरत होते अंगावर फाटके-तुटके कपडे, दाढीचे खुंट वाढलेले, डोक्यावर मडके, एका कानात कवडी व हातात एक खापराची येळणी असा अवतार होता त्यांचा. सकाळीच ते एका गावात गेले. गावातील मुख्य मैदान त्यांनी झाडून स्वच्छ केले. तेवढ्यात गाडगेबाबा गावात आल्याची वार्ता हा हा म्हणता सर्व गावभर झाली. गावातील माणसे तिथे जमू लागली. गाडगेबाबांनी सर्व माणसांना […]

भली खोड जिरली

शाळेजवळच्या एका कोपर्‍यावर विक्रेत्यांची गर्दी असे. त्यात लहान मुलांना मधल्या सुटीत खाता येतील, अशा गोष्टी विकणारे बरेच असत. त्यात एकविक्रेता रोज चणे-फुटाणे व इतर काही पदार्थ घेऊन बसत असे. मधल्या सुटीत शाळेतील मुले आली की त्यांना तो पैसे घेऊन चणे-फुटाणे देत असे. मात्र हा विक्रेता लबाड होता. मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन तो त्याच्याजवळच्या छोट्या मापाने चणे-फुटाणे […]

‘गीत गोविंद’ची श्रेष्ठता

ओरिसातील जगन्नाथपुरी येथील जगन्नाथाचे ( भगवान श्रीकृष्णाचे) मंदिर खूप प्रसिद्ध आहे. तेथेच घडलेली ही एक प्राचीन कथा आहे. त्या नगरीत जयदेव नावाचा हरिभक्त राहत होता. श्रीकृष्णावरील भक्तीपोटी त्याने ‘गीत गोविंद’ हा ग्रंथ लिहिला. तो खूपच लोकप्रिय झाला. अतिशय प्रासादिक व मधुर रचना असलेला हा ग्रंथ घराघरात पोहोचला होता. त्या नगरीचा राजाही कृष्णभक्त होता. त्यानेही असाच एक […]

1 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..