नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

फेसबुकने फ्री बेसिक्सचा गाशा गुंडाळला

गेले बरेच दिवस सुरु असलेल्या नेट न्युट्रॅलिटीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. नेट न्युट्रॅलिटीच्या बाजुने दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) कौल दिला आहे. त्यामुळे भारतीयांना आता त्यांच्या आवडीनुसार आणि पसंतीनुसार इंटरनेटचा वापर करण्याची मुभा मिळणार आहे. गेले काही महिने रिलायन्स आणि फेसबुकने जाहिराती आणि होर्डिंगच्या माध्यमातून रिलायन्सच्या फ्री बेसिक्स प्लॅनचे जोरदार प्रमोशन केले. या मुद्द्यावर अक्षरशः रान […]

दशावतारी पेन्शन !

एकंदरीतच वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. आपल्या देशात आई-वडिलांना देवासारखा मान दिला जातो. पण काही घरात त्यांना अगदी परक्या सारखी वागणुक दिल्याचे बघुन मन अस्वस्थ होतं. खरच आपण इतके निष्ठूर, बेजबाबदार, असहीस्णू, कठोर, दगडाच्या काळजाचे झालो आहोत का? ज्या आई-वडिलांमुळे देवाने निर्माण केलेले हे सुंदर जग बघण्याचे भाग्य लाभले. तेच आई-वडिल आपल्याला जड व्हावेत यासारखे […]

भविष्यातील उर्जेचा पर्याय – सौरउर्जा..!

मानवाच्या वाढत्या गरजा, चैन, भोगवाद, चंगळवाद आणि जगण्याच्या नाना तऱ्हा तसेच वाढलेल्या सत्ता स्पर्धा त्यातून निर्माण झालेले कलह, लढाया आणि त्याला तोंड देता देता पर्यावरणाचा झालेला ऱ्हास भविष्यात आरोग्याच्या चिंता निर्माण केल्याशिवाय राहणार नाहीत. मानवाला आपल्या दैनदिन जीवनात रोज कुठल्या ना कुठल्या समस्येला तोंड द्यावं लागतं. त्यातून वाढलेली महागाई, रोज नव्याने भेडसावणारे विजेचे आणि पावसाचे संकट. […]

चिनी माल खरेदी करणं जीवनावश्यक आहे का ?

एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत कमी असायची त्यामुळे उल्हासनगरचा माल खपायचाही लवकर. लोक गमतीने उल्हासनगरच्या मालाला Made in USA म्हणायचे. म्हणजे Made in Ullhasnagar Sindhi Association. […]

संक्रांत आणि पतंगबाज

निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रातही संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात. आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते. इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात. तर कधी […]

न समजलेले नागरिक-शास्त्र

लहानपणी प्रत्येक मुलाचे काही ना काही स्वप्न असते. कोणाला डॉक्टर, इंजिनियर, सी.ए. वकील, आर्किटेक तर कोणाला शास्त्रज्ञ व्हायचं असत. स्वप्न नक्कीच चांगलीच आहेत पण तरीही कोणाला देशाचा चांगला नागरिक, चांगले आई-बाबा, पालक व्हावेसे वाटतेच ना? प्रत्येकाने स्वत:च्या आंतरमनात शिरून विचार करावा की मग असे लक्षात येईल की या सगळ्या स्वप्नांतून मी नक्की काय प्राप्त केले? मला […]

वर्तनशैली – कचरा अस्वच्छता

कचरा हा म्हटला तर दुर्लक्षित पण वास्तवात आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडला गेलेला असा घटक आहे की ज्याच्या अस्तित्वाने स्वच्छतेच्या अनेक बाबींमध्ये अडचण निर्माण होते. रोगराई अनारोग्य निर्माण होते. परिसर हा गलिच्छ दुर्गंधीने हैराण तर होतोच पण प्रत्येकाला लाज वाटावी अशी ओंगळवाणी प्रतिमा जगासमोर होते जी हे ‘विश्वची माझे घर’ म्हणणार्‍या भारताला निश्चितच भूषणावह नाही. देश म्हटला […]

लोकल ट्रेनमधील अपघातांच्या निमित्ताने !

माणसाला वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी रोज कुठल्याना कुठल्या वाहनाने प्रवास हा करावाच लागतो. मग तो सायकल, स्कूटर, मोटार, बस, बोट-होडी, रेल्वे किंवा विमान असो. प्रवास करतांना अपघात होतात म्हणून प्रवास करण्याचे टाळता येत नाही. मुंबईच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात रेल्वे ही आपल्या दैनंदिन जीवनाचा खुप मोठा हिस्सा बनली आहे. रोजची गर्दी, डब्यातील भांडणं आणि मार्‍यामार्‍या या सगळ्यांमुळे […]

वर्तनशैली – मोबाईल वापरताना !!

पूर्वीच्या काळी आपल्या सर्वांची जीवनशैली आणि राहणीमान, ही सोपी आणि सुटसुटीत आणि एकसंध अशी होती. एकत्र कुटुंबामध्ये सर्वप्रकारचे सण, कार्ये उत्सव साजरे व्हायचे. शेती, नोकरीधंदा तत्सम उद्योगामध्ये घरची मंडळी व्यस्त असायची. त्यामुळे जगण्याला फारसे पदर नसायचे वा सार्वजनिक वावर हा क्वचित प्रसंगी असायचा. आजच्या गतिमान युगात मात्र बदलत्या वेगवान जीवनशैलीमुळे सर्वांचा सार्वजनिक जीवनातला सहभाग वाढला आहे.
[…]

मुंबई ते कल्याण रेल्वेप्रवासाची नांदी

१८५४ मध्ये मुंबईजवळचा पारसिकचा डोंगर फोडून त्यातून बोगदा खोदून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. नवीन लोहमार्ग टाकून झाल्यानंतर या लोहमार्गाची चाचणी करुन घेण्यासाठी १ मे १८५४ रोजी मुंबईचा गर्व्हनर लॉर्ड एलफिन्सटन याने २५० प्रतिष्ठित नागरिकांसमवेत आगगाडीतून कल्याणचा दौरा केला. त्यापूर्वी जेमतेम एक वर्षाआधी भारतातीलच नाही तर आशिया खंडातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ ला मुंबई – […]

1 227 228 229 230 231 240
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..