नवीन लेखन...

शैक्षणिक

डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी

२६ जानेवारी २०१४ ला पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेल्या डॉ. ज्येष्ठराज भालचंद्र जोशी यांचा जन्म १९४९ साली सातारा जिल्ह्यातील ‘मसूर’ला झाला. नंतर ते कराडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून बीएस्सी करून मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियांत्रिकीत बीई, एमई व पीएच.डी. झाले. त्यानंतर त्यांनी तेथेच अध्यापनाचे काम सुरू केले. २००४ ते २००९ या काळात ते संस्थेचे संचालक होते. रसायन […]

बुलेटप्रूफ जॅकेट

बुलेटप्रूफ जॅकेटची चर्चा मुंबई हल्ल्यानंतर प्रामुख्याने झाली होती. ती जॅकेट्स ही चांगल्या दर्जाची नव्हती, असेही त्यावेळी सांगण्यात आले. शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला चिलखत परिधान करून गेले होते, यावरून अशा साधनाची आवश्यकता फार जुन्या काळापासून जाणवत होती हे उघड आहे. […]

डॉ. वामन रामचंद्र कोकटनूर (१८८७-१९५०)

पूर्वीच्या मुंबई प्रांतातील अथणी (आता कर्नाटकात) येथे जन्मलेल्या कोकटनूर यांनी बीएस्सी केल्यावर पुण्याच्या रानडे औद्योगिक संस्थेत रसायनतज्ज्ञ म्हणून एक वर्ष काम केले. नंतर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली व ते कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरी पुढील शिक्षणासाठी गेले. बटाट्यावर संशोधन करण्यासाठी ते तेथे गेले होते. पण त्या वर्षी पीक बुडाल्याने त्यांना करता संशोधन आले नाही आणि शिष्यवृत्ती परत करावी […]

क्वांटम कॉम्प्युटर

क्वांटम कॉम्प्युटर हा अशा प्रकारचा संगणक असतो ज्यात क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पुंज यांत्रिकीचा थेट वापर केलेला असतो. सुपरपोझिशन व एन्टँगलमेंट अशी दोन तत्त्वे वापरून त्यात माहितीचे संस्करण केले जाते. […]

डॉ. रघुनाथ माशेलकर

१९४३ साली जन्मलेल्या रघुनाथ अनंत माशेलकर यांनी यथावकाश मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून रसायन अभियंता म्हणून आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. ही केली. त्यानंतर ते इंग्लंडच्या सालफोर्ड विद्यापीठात गेले व तेथे त्यांनी पॉलिमर इंजिनिअरिंगमध्ये संशोधन केले. तेथून परत आल्यावर ते पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये काम करू लागले. सहा वर्षे ते या लॅबोरेटरीचे […]

हेडफोन

हेडफोनने श्रवणाच्या क्षेत्रात मोठीच क्रांती केली आहे यात शंका नाही. आजकाल आपण मोबाइल फोन, एमपी ३ प्लेयर यातही हेडफोनचा वापर करतो त्यामुळे फोन कानाला लावायची गरज राहात नाही. […]

भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा. द. बा. लिमये

प्रा. दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये (१८८७-१९७१) यांनी १९११ साली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात अभ्यास करून मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात प्रथम वर्गात प्रथम क्रमांकाने एमए केले. त्यामुळे मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांना प्राचार्य शार्प यांनी प्राध्यापक पद देऊ केले होते. पण इंग्रज सरकारची नोकरी न स्वीकारण्याच्या त्या काळात त्यांनी ती नोकरी न स्वीकारता पुण्याला नव्याने निघालेल्या रानडे इंडस्ट्रियल अॅण्ड इकनॉमिक इन्स्टिट्यूटमध्ये […]

प्लाझ्मा टीव्ही

एलसीडी टीव्हीमध्ये जसा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्लाझ्मा टीव्हीत प्लाइमा सेल्सचा वापर केला जातो. हे प्लाझ्मा सेल्स म्हणजे फ्लुरोसंट लॅपवर आधारित चेंबर्स असतात. आपले सीएफएल बल्ब ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याच पद्धतीने हे प्लाझ्मा सेल कार्यान्वित केले जातात. […]

भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा. एस. के. के. जतकर

प्रा. जतकर हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे पहिले प्रमुख होते. ते नोबेल पुरस्कारविजेते डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचे सहकारी. त्यांचे संपूर्ण नाव शंकर खंडो कुलकर्णी जतकर. ते मुळातले सांगली जिल्ह्यातल्या जत गावचे. त्यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस्सी. केले. प्रथम ते हैदराबादच्या निजाम महाविद्यालयात अध्यापनासाठी गेले, पण संशोधनाची तीव्र इच्छा असल्याने तेबंगलोरच्या परत इंडियन […]

अखंड खंड

पृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण वेगळा आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या भूभागांना स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु आज वेगवेगळं अस्तित्व असलेले हे सगळे भूभाग, काही कोटी वर्षांपूर्वी एका महाखंडाच्या स्वरूपात एकत्र वसले होते. […]

1 17 18 19 20 21 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..