नवीन लेखन...

कॅल्शियम

कॅ ल्शियम याला आपण चुना असेच म्हणतो. चुना हे आपल्या शरीरात सर्वत्र आढळतो.

अगदी खनिज द्रव्यापासून ते सर्व हाडे, दांत, स्नायू वगैरे भागातून सतत मिळत असते. तसेच कॅल्शियम हे दोन प्रकारचे असते. पहिले म्हणजे आपल्या हाडाला अगदी घट्ट चिकटलेले असते आणि दुसरे म्हणजे आपल्या हाडापासून सुटून मिळत जाते.

एक शास्त्रज्ञ डॉ. सोमेर यांनी याच शतकात भरपूर संशोधन केले. तसेच चुन्यामुळे आपल्या लहान आतड्यात चुना भरपूर प्रमाणात आढळतो व त्याला जीवनसत्व डी यांचीच जरूरी असते. जेव्हा भारतातील आपल्या हाडाचे हळूहळू विघटन होते त्याच वेळी चुना कमी प्रमाणात होत जातो. त्यामुळे हाडे जास्त ठिसूळ होत जातात. यालाच आपण ऑस्टिओस्पोरोसीस असे म्हणतो.

आपल्या शरीरातील कॅल्शियमचे मुख्य गुण म्हणजे आपले हाडे, दांत व स्नायू यांची बळकटी करणे. कॅल्शियम कमी जास्त प्रमाणात वाढत असल्यास त्याचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. चुना शरीरात असल्यामुळे आपले स्नायू आपोआप आकुंचन पावतात.

कॅल्शियम आणि चुना यांचा नेहमी परस्पर संबंध असतो. व चुनाचा प्रभाव जर कमी पडला तर ह्रदयात त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर कॅल्शियमचे प्रमाण कमी होत असल्यास तर लहान मूल अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय याच कारणामुळे दुखावतात. अशावेळी पोटॅशियम बरोबर कॅल्शियमचा आहार जास्त करण्याची जरूरी असते.

दूध हे मनुष्य प्राण्याचे मुख्य आहार असतो. जर चुना कमी प्रमाणात असला तर त्याचे ताबड़तोब आहार घेतल्याने ते बरा होऊ शकतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, फ्लोराईड आणि फॉस्फरस हे आपल्याबोबर काम करतात. आणि हे आपले हाडे व दांत यांची सातत्याने काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे व जस्त (झिंक) यामुळे कॅल्शियम बरोबर आपल्या लहान आतड्याचे थर बसतो.

कॅल्शियमचा उपयोग

१. कॅल्शियममुळे हाडे व दात यांची मुख्यत्वे करून निगा राखते. त्यामुळे ॲस्टीओस्पेरोसीस पासून संरक्षण होते.

२. कॅल्शियममुळे रक्त गोठवते तसेच आपल्या शरीरातील सर्व जखमा बऱ्या होतात.

३. कॅल्शियममुळे शरीरातील रक्तदाब हे कॅल्शियमचे निरसन करते.

४. कॅल्शियममुळे अपचन, अंगातील शक्ती तसेच शीरांचे जीवनकार्य सुकर असते.

५. कॅल्शियममुळे स्नायूंचे आकुंचनचे काम करते. स्नायू आकुंचनचा नंतर उपयोग होतो.

६. कॅल्शियममुळे ह्रदयाचा जर आजार असेल तर कॅल्शियम अथवा मॅग्नेशियम यांचा उपयोग करतात.

  -श्री. मदन देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..