नवीन लेखन...

सी.डी. देशमुख

१४ जानेवारी १८९६ रोजी महाड जवळच्या नाते या गावी ते जन्मले . अतिशय कुशाग्र बुद्धीच्या या महाराष्ट्र-पुत्राने १९१२ साली तत्कालीन Matriculation Examination मध्ये प्रथम येण्याचा विक्रम केला तेव्हा राम गणेश गडकरी यांनी त्यांचे कौतुक काव्य रचून केले होते . इंग्लंडला जाऊन त्यांनी आय .सी. एस . परीक्षा दिली आणि त्या परीक्षेतही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांचे अभिनंदन करताना स्वतः लोकमान्य टिळकांनीच त्याना सरकारी सेवेत राहून देशाची सेवा करण्याचा सल्ला दिला होता . सी .डी. देशमुख यांना त्यांच्या उत्तम प्रशासकीय सेवेसासाठी इंग्लंडच्या राजाने ” सर ” हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला . रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून त्यांची नियुक्ती झाली तो दिवस होता , ११ ऑगस्ट १९४३ . असा सन्मान मिळालेले ते पहिले भारतीय . सुमारे सात वर्षानंतर पंडित नेहरूंच्या आग्रहास्तव ते लोकसभेची पहिली निवडणूक लढले , जिंकले आणि त्यांनी केंद्र-शासनात अर्थ-खात्याचा भार स्वीकारला . संसदेत या देशाचे पहिले अंदाजपत्रक सादर करून त्यावर अतिशय अभ्यासपूर्ण भाषण करणारे ते पहिले अर्थमंत्री ठरले . भारतीय नियोजन मंडळाचे ते उपाध्यक्ष होते . जीवन-विमा कंपन्यांचे त्यांनीच राष्ट्रीकरण केले आणि त्यामुळेच एल.आय .सी .स्थापित झाली . १९५६ साली भाषावार प्रांतरचना होत असताना केवळ मुबई राज्याच्या बाबतीत केंद्र-सरकारने अपवाद करून , गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तिवात न आणता , एकाच मुंबई -राज्याला “द्वि – भाषिक (Bi-lingual State ) ” केलेले त्यांच्या तर्कसंगत आणि मराठी-अभिमानी वृतीला पटले नाही आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंडित नेहरूंना देऊन टाकला . नंतरच्या काळात ते UGC—University Grant Commission चे अध्यक्ष झाले. दिल्ली विद्यापीठाचे उपकुलगुरू झाले. कलकत्त्यामधल्या , Indian Statistical Institute चे ते अध्यक्ष झाले . हैदराबाद येथील , Indian Institute of Public Adminisration चे प्रमुख-पद त्यांनी सांभाळले . National Book Trust चे सन्माननीय चेअरमन होते….त्यांची प्रथम पत्नी , रोझिना नावाची एक ब्रिटीश महिला होती .त्या दोघांना एक मुलगी झाली होती परंतु भारत स्वतंत्र झाल्यावर , अन्य ब्रिटीश लोकांप्रमाणे रोझिना मुलीला घेऊन इंग्लंडला कायमची निघून गेली . कालांतराने , नियोजन -मंडळावर पहिल्या महिला -सभासद म्हणून नियुक्त झालेल्या विदुषी आणि सामाजिक कार्यकर्त्या , आंध्र-प्रदेशातील काकीनाडा येथे जन्मलेल्या , तेलुगु -भाषक रेवती राव , यांच्याशी ते विवाहबद्ध झाले . त्याच दुर्गाबाई देशमुख झाल्या आणि पुढे ते दोघे हैदराबाद येथेच राहू लागले . १९७५ साली सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख या दोघा पती-पत्नींना एकाच वेळी , ” पद्म-विभूषण ” किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला . Orient Longmann सारख्या विख्यात प्रकाशकांनी त्यांचे आत्मचरित्र ” The Course of My Life ” १९७४ साली प्रसिद्ध केले . …………….अशा या असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तीला राष्ट्रपती-पद प्राप्त झाले असते तर तो त्यांच्या यशोमय जीवनाचा परमोच्च बिंदू ठरला असता ! १९६९ साली राष्ट्रपती-पदासाठी झालेल्या निवडणुकीत अपयश आल्यानंतर हैदराबाद येथे आपले उर्वरित आयुष्य एकांतात व्यतीत करत असताना २ ऑक्टोबर १९८२ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले . त्यांच्या अंत्यविधीसमयी कुणीही महत्वाची –अतिमहत्वाची व्यक्ती उपस्थित नव्हती . असे असले तरी जन -हृदयात त्यांचे स्थान , एक आदर्श पुरुष म्हणून कायमचे राहणार आहे !

– समीर गुप्ते

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..