नवीन लेखन...

बुद्धीदेवता श्री गणेश – शारदानाथ

शारदानाथ अश्विन शुद्ध नवमी हा महा बुद्धीचा प्रगट दिनोत्सव. त्यादिवशी सूर्यास्त समयी भगवती बुद्धीचा जन्मोत्सव करण्याची पद्धत आहे.

या काळाला शरदऋतू असे म्हणतात. त्याकाळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असेही संबोधले जाते.

भगवान ब्रह्मदेवांचे मानसपुत्र महर्षी अंगिरा यांनी देवी बुद्धीचे विशेष अनुष्ठान केल्यामुळे अश्विन शुद्ध नवमीला देवी बुद्धि त्यांच्या आश्रमात शारदा रूपात प्रगट झाली.

वर्षाऋतूच्या समाप्तीनंतर ग्रीष्माचा दाह शमन झालेला असताना, सर्वत्र सुजलाम सुफलाम अवस्था असतांना सृष्टीची जी शांत, प्रसन्न, शीतल परिपक्व अवस्था, ती अवस्था साधकाला ज्या देवी बुद्धीच्या कृपेने प्राप्त होते तिला शारदा असे म्हणतात.

देवी बुद्धी की कृपा म्हणजे जणू काही शरदाचे चांदणे. या देवी शारदेचे भगवान श्री गणेशांसह मीलन होते अक्षय तृतीयेला. त्या दिवसाला गाणपत्य संप्रदायात शारदेशमंगल असे म्हणतात. जिच्या उपासनेने भगवान गणेशांची अक्षय्य कृपा प्राप्त होते त्या शारदेच्या प्रियतम असणाऱ्या भगवान गणेशांना तिच्याच नावाने श्री शारदानाथ असे म्हणतात.

— प्रा. स्वानंद पुंड.

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..