नवीन लेखन...

आयुष्यात कधी केव्हा

आयुष्यात कधी केव्हा
काही अकल्पित घडतं,
नियतीच्या हातातील सूत्र
अचानक मग बदलतं..
काळ नावाचा घाला
अवचित आयुष्यात येतो,
होत्याचं नव्हतं एका
क्षणात सगळं होतं..
नशीबापुढे माणूसही
हतबल असह्य होतो,
जितकं असेल जीवनात
तितकचं दान पदरी पडतं..
क्षणभंगुर आयुष्य सारं
शाश्वती कसलीच नसते,
आज आहे तर उद्याची
खात्री नक्कीच नसते..
भोग असतात जीवनात
भोगून जायचे असतात,
चार प्रेमळ माणसं भेटता
आयुष्य नौका सहज तरतात..
जीवनच उसन असतं
विधात्याचं पानं असतं,
बोलावणं आलं यम दारी
की हे देवाचं दान असतं..
खांदा द्यायला चार जण तर
अश्रू पुसायला पण हवं असतं,
अंतिम यात्रा किती मोठी मग
माणसाचं मोठेपण त्यात असतं..
कोण कसा जीवनी येतो
हे विधात्याचं गणित असतं,
माणसं जोडावी आपुलकीने प्रेमळ
हे मात्र आपल्या हातात असतं..

— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..