नवीन लेखन...
Avatar
About (वैद्य) सुविनय दामले
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

याला जीवन ऐसे नाव भाग २१

पाणी शुद्धीकरण भाग एक दूषित पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर स्नानादिकांसाठी वापरले तरी अनेक रोग होतात, असे ग्रंथकारांनी नमूद करून ठेवले आहे. दूषित पाण्यात कोळी, मासे इ. प्राण्यांची विष्ठा,मूत्र,त्यांच्या शरीरातील अन्य स्राव, किंवा त्यांचे मृत शरीर यामुळे दोष उत्पन्न होतात. तसेच अतिसूक्ष्म आणि स्थूल कृमी किटक, पालापाचोळा, चिखल, पाण्यावर वाढणारे डासाप्रमाणे असणारे अन्य जीवजंतु, किंवा त्यांच्यापासून […]

याला जीवन ऐसे नाव भाग २०

पाण्याची शुद्धाशुद्धता पाणी जसे मिळते तसेच जर वापरले तर ते प्रमेहाचे कारण आहे, असे सांगितले आहे. त्यासाठी शास्त्रकार ग्राम्य उदक असा शब्द वापरतात. पावसाचे आकाशातून पडणारे पाणी सोडून अन्य सर्व प्रकारच्या पाण्यात दोष असतात. दोष फक्त नलोदकात असतात, असे नाही. अनेक आजार अशुद्ध पाणी पिऊन होत असतात, हे केवळ आधुनिक विज्ञान सांगते असे नाही तर, अतिप्राचीन […]

याला जीवन ऐसे नाव भाग १९

पाणी कसे साठवावे ? अंतरिक्षातून पडणारे पाणी साठवण्यासाठी स्वच्छ पात्र अपेक्षित आहे. सोन्याचे असल्यास सोन्याहून पिवळे ! नाहीतर ज्या अठरा मूलद्रव्यांनी शरीर बनलेले तीच अठरा मूलद्रव्ये असलेल्या मातीच्या मडक्यात अंतरिक्ष पाणी साठवावे.व्यवस्थित झाकून ठेवले तर हे टिकाऊ असते. कोणत्याही संस्कारांची आवश्यकता नसते. पण एकदा हे पाणी जमिनीमधे मुरले की त्यात अशुद्धी येण्यास सुरवात होते. प्रदेशानुसार पाणी […]

याला जीवन ऐसे नाव भाग १८

जलाचे दोन प्रकार आकाशातून खाली येणारे आणि जमिनीतून वर येणारे. त्यातील आकाशातून खाली येणारे पाणी हे जास्त श्रेष्ठ सांगितले आहे. पावसाचे पाणी जमिनीवर पडण्यापूर्वी स्वच्छ भांड्यात धरणे आवश्यक आहे. जमिनीला स्पर्श झाला की, त्यातील अशुद्धी पाण्यात मिसळायला सुरवात होते. पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात ही पाण्याची पहिली शुद्धी आणि ढगाला थंड हवा लागली की त्याची […]

याला जीवन ऐसे नाव भाग १७

वाग्भट सूत्र स्थान 5 मधे ग्रंथकार असे म्हणतात, आकाशातून थेट खाली येणारे पाणी हे सर्वोत्तम. याला गांगेय जल, ऐंद्र जल, अंतरीक्ष जल किंवा दिव्य जल असे म्हणतात. जमिनीतून पण पाणी वर येते, जसे विहिरीतून येणारे. याला भूमीतून येते म्हणून भूमीज किंवा भौमजल म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या पाण्याला कोणतीही विशिष्ट चव नसते, रंग नसतो, वास नसतो, पण […]

याला जीवन ऐसे नाव भाग १६

न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् । सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।। फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः । वाग्भट सूत्र स्थान 5 – 5/6 भाग 4 ज्या पाण्याला गती नाही, त्या पाण्यावर शेवाळ धरते. बुळबुळीतपणा वाढतो. साठण्याची प्रक्रिया वाढली कि, कुजण्याची क्रिया सुरू होते. कुजणे म्हणजे बुडबुडे येणे. असे आपोआप बुडबुडे येणारे पाणी पचायला जड असते. कुजण्याची प्रक्रिया म्हणजे जंतुनिर्मिती. जंतु […]

याला जीवन ऐसे नाव भाग १५

न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् । सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।। फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः । वाग्भट सूत्र स्थान 5 – 5/6 भाग 3 जसं काळोख्या जंगलातील पाणी निषिद्ध सांगितले आहे, तसेच आपल्या घरातील असा प्रदेश म्हणजे शीतकपाट. या फ्रीजमध्ये देखील असाच काळाकुट्ट काळोखच दडलेला असतो. शीतकपाटामधे ना सूर्यप्रकाश, ना चंद्रकिरण ना वाऱ्याची झुळुक. हे कारण देखील ग्रंथकार देताहेत. […]

याला जीवन ऐसे नाव भाग १४

  न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् । सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।। फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः । वाग्भट सूत्रस्थान 5-5/6 भाग दोन सूर्य, इंदु म्हणजे चंद्र आणि पवन म्हणजे वारा यांची दृष्टी न पडलेल्या पाण्याची घनता वाढल्यामुळे असे पाणी पचायला जड होते. तसेच अशा पाण्यामध्ये, दुसऱ्या पदार्थात चिकटपणा निर्माण करण्याची क्षमता अधिक वाढते. शास्त्रकारांनी मूळ सिद्धांत त्या काळी सांगून […]

याला जीवन ऐसे नाव भाग १३

  न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् । सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।। फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः । वाग्भट सूत्रस्थान 5-5/6 “चिखल, शेवाळ, गवत, व पाने यांनी व्याप्त व गढुळ झालेले, ऊन, चांदणे, व वायु यांचा जेथे कधीही प्रवेश झाला नाही अश्या ठिकाणचे, पावसाचे पाणी, नुकतेच मिळाल्यामुळे राड झालेले, जड, फेस आलेले, कृमीयुक्त, तापलेले, व दातास कळा उत्पन्न करण्यासारखे गार […]

याला जीवन ऐसे नाव भाग १२

  वाग्भटाचार्य म्हणतात, भोजनापूर्वी पाणी पिल्याने, (भूक मेल्याने, जेवण कमी जाते. परिणामी ) शरीर बारीक होते. जेवणानंतर पाणी पिल्याने जाडी वाढते. जेवण झाल्यामुळे अग्नि मंद झालेला असतो. पोटात आलेले अन्न, घुसळण्याचे काम सुरू होऊन, पचनाचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी पाणी पिल्याने, उकळी आलेल्या तयार चहात थंडगार पाणी ओतून सर्व चहा परत गार अवस्थेत नेल्यासारखे […]

1 30 31 32 33 34 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..