नवीन लेखन...
Avatar
About प्रकाश पोहरे
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

संगनमताच्या राजकारणाने नासविली व्यवस्था!

सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करून आपल्या धारदार वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला घाम फोडणारे आमदार हवेतच कुणाला? इथे गरज राडा करणार्‍यांची आहे. बी.टी. देशमुख, वि.स.पागे  यांचा जमाना आता संपला आहे. मधू लिमये, मधू दंडवते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यांच्या सारख्यांची उपयुक्तता देखील संपुष्टात आली आहे.
[…]

मारेकर्‍यांसाठी पायघड्या !

आमच्या देशातून नेलेल्या लुटीवर तुमची श्रीमंती, तुमचा माज पोसला जात आहे आणि तुम्ही आम्हालाच कोहिनूर आमचा आहे, भवानी तलवार आमची आहे, असे सुनावणार आणि आम्ही ते षंढपणे ऐकून घेणार! कुठल्याच नेत्याने, कुठल्याच वर्तमानपत्राने किंवा अन्य मीडियाने कॅमरून यांच्या या मुजोरपणाचा निषेध केलेला नाही. खरे तर जालियनवाला बागप्रकरणी माफी मागण्यास कॅमरून यांनी नकार देताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळायला हवी होती; परंतु आमचे दुर्दैव असे, की कुठे संतापून उठावे आणि कुठे संयम दाखवावा, हेच आम्हाला कळत नाही.
[…]

उदंड जाहल्या सुट्ट्या !

सुट्ट्यांच्या बाबतीत जी जागरूकता, जो आग्रह सरकारी कर्मचारी दाखवितात तो आग्रह किंवा ती जागरूकता कामाच्या बाबतीतही दाखवायला पाहिजे. स्वत: सरकारी कर्मचाऱ्यांनीच पुढे होऊन, आम्हाला नकोत या सुट्ट्या असे सांगायला पाहिजे; परंतु सध्यातरी तसे होण्याची सुतराम शक्यता नाही. हे ज्या दिवशी घडेल तो दिवस निश्चितच भाग्याचा असेल आणि त्याच दिवसापासून आपला प्रवास खर्‍या अर्थाने महासत्तेच्या दिशेने सुरू झालेला असेल. […]

शिक्षण क्षेत्राचा सांगाडा !

आपली संपूर्ण शिक्षणप्रणाली विदेशी विद्यापीठांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच सरकारने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्राच्या मरू घातलेल्या सांगाड्यात जीव ओतण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नव्या रसरशीत, चैतन्याने भरलेल्या, इथल्या संस्कृतीशी, प्राचीन ज्ञानाशी इमान राखणार्‍या शिक्षणपद्धतीला विकसित होऊ द्यावे. […]

नादानपणाची मर्यादा

नद्या विकल्या जात आहेत, जमिनीची उत्पादकक्षमता स्वत:च्या हाताने संपविली जात आहे, आपण खात असलेल्या अन्नात रासायनिक खताच्या माध्यमातून विष मिसळलेले आहे, हे माहीत असूनही आनंदाने आपण ते ग्रहण करीत आहोत; मात्र आपण काही चूक करीत आहोत किंवा कोणी आपल्याला जागवत आहे, याची जाणीवच आपण हरवून बसलो आहोत. आपल्या संवेदनाच संपल्या आहेत. […]

लाचार, मुर्दाड की दिशाहीन ?

जुन्या काळातली राजेशाही असो अथवा आधुनिक काळातील लोकशाही असो, सत्ताधार्‍यांचा धर्म आणि वृत्ती नेहमी सारखीच राहात आली आहे. या सत्ताधार्‍यांना आपली प्रजा मुर्दाड आणि प्रतिकारहीन राहावी असेच वाटत आले आहे. आज २१ व्या शतकातही दुर्दैवाने सत्ताधार्‍यांच्या आणि जनतेच्या एकूण मनोवृत्तीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. तेच बेलगाम सत्ताधीश आणि तीच मुर्दाड, लाचार जनता!
[…]

काळवंडलेला राष्ट्राभिमान !

अतिरेक्यांच्या कारवायांमुळेच तर आपल्याला आपल्या संयमाची कसोटी पाहता येते, आपल्या अंत:करणाची विशालता, आपल्या हृदयात वास करीत असलेली क्षमाशीलता अशा हल्ल्यांमुळेच तर जगासमोर येते. समोर युद्धाला उभे ठाकले ते सगळे माझे आप्तेष्ट आहेत, कुणी भाऊ आहे, कुणी काका आहे, कुणी मामा आहे, मी त्यांच्यावर शस्त्र कसे चालवू म्हणून शस्त्र टाकून खाली बसलेल्या अर्जुनाला कान धरून उभे करीत ते इथे उभे आहेत ते तुझे शत्रू म्हणून आणि शत्रूचा नि:पात करणे हाच क्षत्रिय धर्म आहे, तू तुझ्या धर्माचे पालन कर, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, असे सांगणारा श्रीकृष्ण याच भारत देशात होऊन गेला, हे सांगण्याचीही लाज वाटावी इतका आमचा राष्ट्राभिमान काळवंडला आहे.
[…]

प्राधान्यक्रमाचे अवमूल्यन !

चर्चा कोणत्या मुद्यावर किंवा घोटाळ्यावर व्हायला हवी? १,८६,००,००,००,०००(१ लाख ८६ हजार कोटी) रुपयांच्या घोटाळ्यावर, की सलमान खुर्शिद यांच्या ७६,00,000 (७६ लाख) रुपयांच्या घोटाळ्यावर? रॉबर्ट वड्राची संपत्ती तीनशे कोटींवर गेली हे अधिक महत्त्वाचे, की सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, मीडिया यांच्यातील दलालांनी देशाचे जवळपास दोन लाख कोटींनी नुकसान केले, हे अधिक महत्त्वाचे? कोळसा घोटाळ्यातील एकूण रकमेच्या तुलनेत ७६ लाख किंवा ३०० कोटी हे आकडे अगदीच चिल्लर आहेत. केजडीवालांनी हा सगळा गैरव्यवहार चिल्लर पातळीवर आणून सोडला.
[…]

वेगळा आणि सक्षम पर्याय अपरिहार्य !

सतत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना बाहेर काढून लोकांनी एक नवा संघ उभारावा. गेली साठ वर्षे तोच तो डाव टाकून एक हारणारा जुगार या देशातील लोक खेळत आले आहेत, आता किमान एकदा तरी नवा डाव खेळून पाहायला हरकत नाही. ती या देशाची आजची खरी गरज आहे.
[…]

जाता जाता उरलासुरला देशही विकला !

जेव्हा नाकातोंडात पाणी जाऊ लागते तेव्हा माकडीण आपल्याच पिलाला पायाखाली घेते. डॉ. सिंग वेगळे काय करीत आहेत? त्यांचे सरकार आता अधिक काळ टिकणार नाही हे लक्षात येताच त्यांनी देशाच्या हिताचाच बळी देण्याचा निर्णय घेतला आहे. या देशात सरकार कोणत्या पक्षाचे असावे, पंतप्रधान कोणत्या पक्षाचा असावा हे जरी या देशातील लोक मतदानाच्या माध्यमातून ठरवित असले तरी या देशाची आर्थिक नीती काय असावी, हे मात्र अमेरिका ठरवित असते. हे दुर्दैवी सत्य अजून एकदा अधोरेखित होत आहे.
[…]

1 2 3 4 44
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..