नवीन लेखन...

देवपूजेतील साधन – कलश

Auspicious Things Used For Devpooja - Kalash

भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते.  समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचे ग्रहण करुन जे भांडे बनवले ते म्हणजे कलश होय अशी कथा पुराणात सांगितली आहे.

कळशी या भाड्याचा छोटा आकार म्हणजे कलश.  कळशाचे भांडे पितळेचे अथवा तांब्याचे असते.

क्षितींद्र, जलसंभव, पवन, अग्नी, कोशसंभव, सोम, आदित्य आणि विजय असे कलशाचे विविध प्रकार आहेत. यापैकी विजय कलश पीठाचे मध्यभागी स्थापन केला जातो. अन्य कलश आठ दिशांना ठेवले जातात. कलशाच्या मुखाच्या ठिकाणी ब्रम्हा, गळ्याच्या ठिकाणी  शंकर, मूलगामी विष्णू, मध्यभागी मातृकामण आणि दाही दिशांना वेष्टून दिक्पाल निवास करतात. कलशाचे पोटात सप्तसागर, सप्तव्दीप, ग्रहनक्षत्रे, कुलपर्वत, गंगा आणि चार वेद सामावले आहेत असे शास्त्रकार म्हणतात.

तांब्याच्या कलशात रात्री पाणी भरुन ते सकाळी उठल्यावर अनुशापोटी सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. तांब्याच्या कलशातील पाणी प्यायल्याने इतर अनेक विकारही दूर होतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..