नवीन लेखन...

‘अष्टविनायक’ मराठी चित्रपट

अष्टविनायक या चित्रपटात सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगांवकर यांनी निर्माता म्हणून काम पहिले होते. व मनोरमा फिल्म्स ही निर्मिती संस्था होतीया चित्रपटाले दिग्दर्शक लाभले राजदत्त,व यातील कलाकार होते सचिन पिळगावकर , वंदना पंडित, चंद्रकांत, पद्मा चव्हाण, राजा गोसावी, शरद तळवलकर, डॉ. वसंतराव देशपांडे, रमेश भाटकर, शमा गोसावी, लता थत्ते, सरोज सुखटणकर, माधव आचवल, सुहास भालेकर, बी.माजनाळकर, पांडुरंग बेणारे, उषा चव्हाण, रविंद्र महाजनी, अशोक सराफ, शाहू मोडक, सूर्यकांत, कृष्णकांत दळवी, सुधीर दळवी,आशा काळे, जयश्री गडकर.

या चित्रपटातील गाणी अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांनी गायली होती. त्या काळी तू सुखकर्ता तू दुखहर्ता, प्रथम तुला वंदितो कृपाळा, दिसते मजला सुखचित्र नवे, दाटुनि कंठ येतो ओठात येई गाणे, आली माझ्या घरी ही दिवाळी, अष्टविनायका तुझा महिमा कसा ही सर्व गाणी खूपच गाजली होती. या चित्रपटाला संगीत अनिल अरुण यांनी दिले होते,व गीतलेखन शांता शेळके, शांताराम नांदगावकर, जगदिश खेबुडकर, मधुसूदन कालेलकर यांनी केले होते. अभिनेत्री वंदना पंडित यांचा हा पहिला चित्रपट होता.
अष्टविनायक हा चित्रपट साधारण १९७५ मध्ये इचलकरंजीमध्ये एका कुटुंबांमध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे. (सुरुवातीलाच श्रेयनामावलीत तसा उल्लेख आहे.) हा चित्रपट म्हणजे आस्तिक-नास्तिक या दोन वृत्तींच्या मधला एक सुवर्णमध्य म्हणता येईल!

सिनेमांमध्ये वीणा (वंदना पंडित) पूर्ण आस्तिक तर बाळ (सचिन) अगदीच नास्तिक.

कारखानदार(मिलमालक) चंद्रकांत यांचा परदेशातून शिकून आलेला बाळासाहेब इनामदार (सचिन) हा एकुलता एक मुलगा..मनाने नितळ,पण नियम व धोरणांबाबत कठोर,आईच्या अकाली निधनामुळे (व देवाने यांत अजिबातच दया न दाखवल्यामुळे!)वृत्तीने नास्तिक असलेला. वडील मिलचा कारभार याच्यावर सोपवतात. नवीन कार्यपद्धतीनुसार हा मिलमधील वर्षोनुवर्षे चालत आलेला गणेशोत्सव बंद करतो. परिणामी कामगार नाराज. त्यातच वडिलांचे निधन होते.
एका कामा निम्मित बाहेरगावी गेलेल्या व पावसात अडकलेल्या बाळची भेट होते वीणाशी(वंदना पंडित) वीणा.

पूर्णदेवभक्त,आस्तिक,गुणी,सालस व स्वतःच्या वडलांसारखीच(डॉ वसंतराव देशपांडे) सुंदर सुरेल गात्या गळ्याची मुलगी. बाळ अर्थातच तिच्या प्रेमात पडतो व वडिलांच्या जिवलग मित्राच्या साठे काकांच्या (शरद तळवळकर) मदतीने हे लग्न घडवूनही आणतो. सुरु होतो सुखाचा संसार,नवलाईचे दिवस अन त्याचबरोबर मिलमध्येही नव्याने काही बदल.

विस्तारीकरणासाठी कैक वर्षापासून उभारलेले व कामगारांचे श्रद्धास्थान असलेले गणेशमंदिर मुळापासून हलवले जाते व नवऱ्याला यासाठी प्रथमच कडाडून विरोध करणारी व प्रसंगी त्याच्या विरोधात जाणारी वीणादेखील उन्मळून पडते तुटते. दोघांच्याही या आस्तिक-नास्तिकच्या लढ्यामध्ये,दोघांमध्ये दुरावा व अबोला येतो. त्यातच तिचं Miscarriage हि होते. मरणासन्न अवस्था होते. इकडे मिलमध्ये आर्थिक तोटे येतात, मिलला आग लागते. संकटं जणू सर्वबाजूनी चाल करून येतात. इथे साठेकाका विणाला आठवण करून देतात,तिच्या अपूर्ण राहिलेल्या नवसाची. अष्टविनायक यात्रेची,तेही नवऱ्यासोबत करण्याची, आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,विणाच्या आर्जवी विनंतीला मान देऊन,फक्त तिच्या इच्छेखातर बाळ तिच्यासोबत हि यात्रा पूर्ण करतो…व यात्रेच्या शेवटी अर्थातच गेलेलं सर्व वैभव पुनर्प्राप्तीचा सुखद अनुभवही घेतो!

देव मानावा अथवा न मानावा,हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण त्या अलौकिक शक्तीवर विश्वास मात्र जरूर ठेवावा आणि या गोष्टीचा हा सिनेमा म्हणजे एक सुखद अनुभव आपल्यासाठीही आहे. यातली सगळीच गाणी अतिशय सुरेल आहेत,मनाजवळ जाणारी आहेत.

लग्न ठरल्यानंतर भावी सुखी संसाराची स्वप्नं पाहणाऱ्या विणाचं “दिसते मजला सुख चित्र नवे..” किंवा “आली माझ्या घरी हि दिवाळी!” हे गाणं पाहताना त्या दोघांचा पहिला दिवाळ-सण खूप जाणवून जातो.

लेकीच्या पाठवणीसाठी पंडितजींनी म्हणजेच डॉ वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं व अजरामर झालेलं.. व प्रत्येक बाप-लेकीला जणू आपल्याच या भावना,असं वाटायला लावणारं गाणं..”दाटून कंठ येतो…!”अगदीच हळवं!

“प्रथम तुला वंदितो..”हे गाणं पाहताना व ऐकताना आपणही मंदिरामध्ये उभं असल्याचा फील येतो व सगळ्यात अगदी अप्रतिम ठरलेलं गाणं “अष्टविनायका तुझा महिमा कसा..”

दिग्दर्शन अभिनय,संगीत, सगळयाचबाबतीत अतिशय सर्वोत्तम! या गाण्यामध्ये असलेली त्या काळच्या “वरच्या फळीतील कलाकारांची” उपस्थिती म्हणजे एक वेगळाच व आंनददायक प्रयोग असावा!

वीणा-बाळ यांच्या संसारात काही ना काही काळंबेरं करण्याचं “मौलिक”काम बाळची सावत्र आई (पदमा चव्हाण) यथासांग पार पाडते.. उत्तम भूमिका, उत्तम अभिनय व आईच्या भूमिकेत जरी असल्या तरी त्या कमालीच्या देखण्या दिसल्यात !! माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,राजा गोसावी यांनी साकारलेली “नारू मामा” हि इरसाल, लोचट आणि ऐतखाऊ मामाची भूमिका.. भारीच!(या पात्राला हेच नाव देण्याचं कुणाला बरं सुचलं असेल?परफेक्ट आहे एकदम!)

या सिनेमामधलं एक दृश्य माझ्या कायम आवडीचं राहिलं आहे. कामगारांनी संप पुकारला आहे. मिल बंद आहे,त्यात घरचा माणूस नारुमामा त्यांना अधिक चिथाऊन देतोय. बाळ अगदी हतबल आणि यातून मार्ग काढण्यासाठी साठेकाका तिथे आलेत. कामगारांना पूर्वीचा दाखला देत,नानांनी म्हणजेच बाळच्या वडलांनी त्यांच्यासाठी वेळोवेळी केलेल्या मदतीची आठवण करून देतात. कामगार जरा सद्गदित. नारुमामा साठेकाकांना हाकलून लावतोय अन या गडबडीत त्यांच्या हातातला दागिन्यांचा डबा खाली पडतो.

“हे ठेवा,तुमच्या काकूचे आहेत..उपयोगी येतील..पण नानाची हि मिल बंद ठेवू नका!” कामगारांच्या डोळ्यात पाणी अन हि मिल जरूर चालू राहील काका,हे दागिने ठेवा.. असं आश्वासकपणे म्हणत सगळे परत कामावर रवाना हे दृश्य लांबून पाहणाऱ्या बाळच्याही डोळ्यात कृतज्ञतेचे पाणी…

हयात नसलेल्या आपल्या मित्राच्या मिलसाठी व अडचणीत असलेल्या त्याच्या मुलासाठी एका निष्ठावान सहकाऱ्याने व जिवलग मित्राने केलेलं हे योगदान आता पाहायला मिळेल? मालकाबरोबरची हि बांधिलकी आता दिसणार देखील नाही.
परदेशातून आपल्या देशात आलेल्या MNC मध्ये कितीही मोठा पाच आकडी पगार मिळो पण प्रोजेक्ट्स, अँप्रझेल्स, डेडलाईन्स यांमध्ये कुठे आला हा भावनिक ओलावा? कालाय तस्मे नमः हेच खरं!

या सिनेमाविषयी दोन काहीश्या गंमतीशीर गोष्टी वाचण्यात आल्या होत्या.

अष्टविनायकावरचं गाणं जगदीश खेबुडकरांनी उत्कृष्टच लिहिलं आहे,पण त्यातील एकही गणपती प्रत्यक्ष न पाहता. शरद पिळगावकर यांनी दिलेल्या एका पुस्तकाच्या आधारे त्यांनी इतकी अनुपम रचना रचली.

अष्टविनायक चित्रपटा मधील गाणी.

https://www.youtube.com/watch?v=fNHBbuhiJ7w

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..