नवीन लेखन...

तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥

वीर सावरकरांनी १९२६ साली व्यसनमुक्ती वर लिहिलेली कविता

तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥

भुरळ घातली या पेयाने कैसी रे तुजला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥

पैसे देऊनी विषास पीशी। हे न कळे तुजला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥

मिळे कुठे जी कवडी दमडी। देशी बाटलीला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥

देशिल तरी मग भुकेस कुठला। घास मुलाबाळा।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥

शुद्धी जातसे मारीसी घरच्या। दीन बायकोला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥

क्षणिक सुखास्तव मिळविसी मातीस। सगळ्या जन्माला।
तू सोड सोड भाऊ । दुष्ट दारूला॥

— स्वातंत्र्यवीर सावरकर,
1926 – रत्नागिरी

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..