नवीन लेखन...

जन्म

माझ्या अक्षर यात्रेतल्या प्रवासात
स्पदनांचं धुकधुकणं थांबलंय
अफाट वेगाची मर्यादा
भोवाळतीय मनाला
सतत धावणं ,सतत गुरफटणं वळणांचा ससेमिरा
ही फार रे..
पायाखालचा रस्ता भुलवत नेतो
त्या सांदी कपारीतून
अव्यक्ताचं देणं असल्या सारखं
शोध कुठवर घ्यायचा ..?
मग माझ्या मनातले गहींवर
ओंथंबून येतात..
एकेक शब्द लयींचा किनारा होतो..
निळ्याशार शाईचा समुद्र होतो..
बुद्धी भ्रष्टतेचे फासे दोन ,चार सहा
कसे ही पडतात..
पण एक अधांतरी असणारा विचार
स्थिरावतो ,त्या गुलाबी कागदी नभावर
माझी कविता सहत्रावर्तनात
अवतरते अलगद,हळुवार त्या
त्या मेघमालांचा साक्षात्कार घडवत
तूफान कोसळतो विचारांचा नभ
एका उन्मुक्त कवितेचा
जन्म होतो .. माझ्याच अश्रुंच्या
उधाणलेल्या तांडवात…

— ©लीना राजीव.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..