नवीन लेखन...

रक्तदाब कमी होणे(Low B.P)

रक्तदाब कमी होण्याच्या समस्येकडे हायपरटेंशन ( रक्तदाब वाढणे) इतके लक्ष दिले जात नसले तरीही त्यातून आजाराची गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ / निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षण आढळतात. अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर नेमके काय करावे हे अनेकांना सुचत नाही.

अचानक डोळ्यांसमोर अंधार येणे, गरगरल्या सारखे वाटल्यास ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.

ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस ) शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा. व त्याप्रमाणे मिश्रण बनवून प्या. मात्र मधूमेहींनी तयार ओआरएस पावडर पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरेचादेखील समावेश असतो.

तुमच्याजवळ ओआरएस नसल्यास पाणी प्या. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मीठातील सोडीयम रक्तदाब सुधारेल. तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करेल.

रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा उपाय अनेकजण करतात. यामुळे रक्तदाब सुधारण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अति करू नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.

रक्तदाब स्थिरावल्यानंतर तसेच तुम्हांला सामान्य वाटत असले तरीही डॉक्टरांना त्वरीत भेटा. तसेच नेमके कशामुळे रक्तदाब कमी झाला हे जाणून घ्या. अनेकदा ही समस्या लहान स्वरूपात असताना त्याकडे दुर्लक्ष करतात आणि अचानक त्रास वाढल्यास डॉक्टरांचा धावा करतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित ते तपासून घ्या. 110/60 mm Hg पेक्षा कमी झाले तरीही अनेकदा त्याची लक्षण आढळून येत नाहीत. त्यामुळे त्रास जाणवत असल्यास स्वतःची औषाध स्वतः निवडण्यापेक्षा डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..