नवीन लेखन...

मोर्चे काढायचेच तर मराठा पुढार्यांच्या घरावर काढा

मोर्चे काढायचेच असतील तर , मराठा पुढार्याच्या घरावर काढु या !!
कारण गेले 60 वर्षे महाराष्टात
बहुसंख्य मुखमंत्री मराठा
बहुसंख्य मंत्री मराठा
बहुसंख्य आमदार मराठा ( आताही )
बहुसंख्य सहकारी साखर कारखाने ,
मूठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य खाजगी साखर कारखाने ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य सहकारी बँका ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य नगरपालिका ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य जिल्हा परिषदा ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य पंचायत समित्या ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य दुध सोसायटी ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य ग्रामपंचायती ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य सहकारी सोसायटी ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
बहुसंख्य शिक्षण संस्था ,
मुठभर मराठयांच्या ताब्यात !
सर्व प्रकारच्या नौकऱ्यात भरती ,
मुठभर श्रीमंत मराठयांच्या पोरांची !
शेती विकासाच्या बहुसंख्य योजना ,
मुठभर मराठयांच्या शेतात !
सिंचन योजनांचे सर्व पाणी व पैसा ,
मुठभर मराठयांच्या शेतात व घरात !
ग्रामीण विकासाच्या नावाने आलेला पैसा ,
मुठभर मराठयांच्या घरात !
मग ?
गरीब मराठा तरुण – तरूणींना ,शेतकऱ्यांना ,शेतमजुरानां व महिलांना काय मिळाले ?
बेकारी , गरिबी , उपासमार , कुपोषण, आत्महत्या , हुंडाबळी , बलात्कार तसेच महिलाना परित्यक्ता व विधवा म्हणुन जगणे .
हे बदलायचे असेल
व मोर्चेच काढायचे असतील तर गेले 60 वर्षे ज्यांनी सर्व थरातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवुन सर्व गरीबांना आपल्या प्रभाखाली व दबावाखाली ठेवुन आपले व आपल्या नातेवाईकांचे भले करुन घेतले त्या सर्व पक्षातील मुठभर मराठा नेत्यांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजेत .

सर्व जाती – धर्मातील गरीबांची एकी करुन सत्ता ताब्यात घेउन सर्व गरीबासहित आपले प्रश्न सोडवून घेतले पाहिजेत .
केवळ जातीचे मोर्चे काढुन गरीब मराठयांचे कधीच भले होणार नाही तर भले मुठभर सत्ताधारी व श्रीमंत मराठयांचेच होईल हे लक्षात ठेवा .
उलट
या “मराठा क्रांती मोर्चा “मुळे सर्व जातीतील गरीबात द्वेष व दरी वाढेल . त्यामुळे मराठयांसहित सर्व गरीबांचे प्रश्न सोडवनेच मुश्कील होईल असे मला वाटते .

— — बी. के. पाटील

एक अस्वस्थ मराठा तरुण पटलं असेल तर पुढे पाठवा ….

व्हॉटसअॅप वरुन…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..