नवीन लेखन...

मनाचे श्लोक – १६१ ते १७०

अहंतागुणे सर्वही दुःख होते | मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते |
सुखी राहता सर्वही सूख आहे | अहंता तुझी तूचि शोधूनि पाहे ||161||

अहंतागुणे नीति सांडी विवेकी | अनीतीबळे श्र्लाघ्यता सर्व लोकी |
परी अंतरी सर्वही साक्ष येते | पःमाणांतरे बुेि सांडूनि जाते ||162||

देहेबुेिचा निश्र्चयो दृढ झाला | देहातीत ते हीत सांडीत गेला |
देहेबुेि ते आत्मबुेि करावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||163||

मने कल्पिला वीषयो सोडवावा | मने देव निर्गूण तो वोळखावा |
मने कल्पिता कल्पना ते सरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||164||

देहादीक पःपंच हा चिंतियेला | परी अंतरी लोभ निश्र्चीत ठेला |
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||165||

अहंकार विस्तारला या देहाचा | स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा |
बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी | सदा संगती सज्जनाची धरावी ||166||

बरा निश्र्चयो शाश्र्वताचा करावा | म्हणे दास संदेह तो विसरावा |
घडीने घडी सार्थकाची करावी | सदा संगती सज्ज्नाची धरावी ||167||

करी वृत्ति जो संत तो संत तो संत जाणा | दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा |
उपाधी देहेबुेिते वाढवीते | परी सज्जना केवि बाधू शके ते ||168||

नसे अंत आनंत संता पुसावा | अहंकार विस्तार हा नीरसावा |
गुणेविण निर्गूण तो आठवावा | देहेबुेिचा आठवो नाठवावा ||169||

देहेबुेि हे ज्ञानबोधे त्यजावी | विवेके तये वस्तुची भेट घ्यावी |
तदाकार हे वृत्ति नाही स्वभावें | म्हणोनी सदा तेचि शोधीत जावे ||170||

– श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..