नवीन लेखन...

निरंजनदास बल्लाळ – गणेश

    

निरंजनदास बल्लाळ हे गणेशभक्त व गीतेचे टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. ते निरंजनस्वामी कऱ्हाडकर यांचे शिष्य. हे मूळचे बीडचे असा उल्लेख निरंजनस्वामींचा चरित्रकार नातू भगवंत देव यांनी केला आहे. त्यांना दोन बायका होत्या. त्या निवर्तल्या तेव्हा त्यांना संसारापासून विरक्ती आली. ते बाळाजीपंत देव (निरंजनस्वामी) यांच्याकडे आले व प्रार्थनापूर्वक म्हणाले, शरण आलो आहे, संसार न लगे. तेव्हा देवांनी त्यांना पोटाशी धरून बोध केला. विरक्तीची परीक्षा घेतली. पुढे त्यांना सांगितले की, श्वसुरघरी जाऊन, सोयर्‍या-धायर्‍यांकडे भिक्षावृतीने जावे, त्याप्रमाणे ते बीडला गेले व भिक्षा मागू लागले. सोयर्‍यांची बोलणे सोसून मिळाले ते धान्य त्यांनी निरंजनस्वामींपुढे आणून ओतले. तेव्हा स्वामीही सद्गदित झाले. त्यांनी त्यांची पाठ थोपटून आशीर्वाद दिला. संस्कृतचे ज्ञान मिळवून गणेशपुराणावर टीका करण्याची आज्ञा केली. गुरुच्या आज्ञेवरून लिहिलेली गणेशगीता-टीका प्रासादिक आहे. हा ग्रंथ त्यांनी नामलगावी शके १६५१ जेष्ठ व. ४ ला पूर्ण केला. ग्रंथ पूर्ण करताना त्यांनी ज्ञानदेवांप्रमाणेच पसायदान मागितले आहे.

जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..