नवीन लेखन...

नारळीपाकाचे लाडू



 साहित्य :-

पाव किलो जाड रवा,

सव्वा मोठी वाटी नारळाचा चव,

पाव किलो साखर,

अर्ध्या वाटीपेक्षा थोडे कमी साजूक तूप,

पाव वाटी दूध,

पाच वेलदोड्यांची पूड,

आवडत असल्यास बेदाणे दीड ते दोन टेबलस्पून,

साखरेच्या निम्मे पाणी.

कृती :-

तूपावर रवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. पाव वाटी दूध शिंपडून पुन्हा भाजावा.

आता नारळाचा सव्वा वाटी चव घालून भाजण्यास सुरुवात करावी. रवा फुलू लागेल व कोरडाही होऊ लागेल

त्यावेळी परातीत हे मिश्रण काढून घ्यावे. त्याच कढई किंवा पातेल्यात आता पाक करण्यास ठेवावा.

मापाचे पाणी व साखर एकत्र करून मध्यम आचेवर ठेवावे. सतत ढवळत रहावे.

दीडतारी पाक करावा, त्यात वेलदोडापूड, बेदाणे घालून नंतर रवा व नारळाचे मिश्रण घालावे.

व्यवस्थित ढवळून झाकून ठेवावे. एक तासाने पुन्हा ढवळून बघावे.

मिश्रण आळायला सुरुवात झालेली असेल. साधारण चार तासाने लाडू वळावेत.

लाडू लवकर तयार हवे असतील तर दोनतारी पाक करावा त्यामुळे दोनेक तासातच लाडू वळता येतात.

रव्याचा लाडू खरखरीत व किंचित बसका हवा. त्यासाठी रवा जाडसर वापरावा.

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..