नवीन लेखन...

नवरात्र स्पेशल

आजपासून देशभरात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात भाविक नऊ दिवस देवीचे व्रत व उपवास ठेवतात. व्रताच्या वेळी शरीराचं डिटॉक्सिफाय होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आपल्या शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर निघतील. पावसाळ्यात पित्त वाढतं, पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळं उपवासानं पित्त कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रियाही सुधारते. जर आपण ९ दिवस व्रत/उपवास ठेवणार असाल तर या नऊ गोष्टी लक्षात ठेवा…

नवरात्रात व्रतातील आहार कसा असावा?

– हाय फायबर आणि लो फॅट असणारे पदार्थ खावे – मॉर्डरेट प्रोटीन, हाय कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खा – त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यासाठी आहारातील द्रव पदार्थ वाढवा – सामान्य दूधाऐवजी स्किम्ड दूध प्या.

नवरात्रौत्सवात व्रतादरम्यान किती कॅलरीची असते गरज?

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये १८००-२२०० कॅलरीची व्रतासाठी गरज नवरात्रीच्या व्रतात काय करू नये? – फक्त लिंबू-पाणी पिऊन उपवास ठेवू नये. – खाहीही न खाता नुसतं दूध पिऊन उपवास करू नका, असं केल्यानं अशक्तपणा येतो. – यामुळं थकवा, ब्लड प्रेशर लो आणि चिडचिडपणा वाढू शकतो. – गॅस्ट्राइटिस, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. – व्रतात आंबट फळं उदा. संत्री, लिंबू, मोसंबी खाऊ नये. – व्रतादरम्यान लंच आणि डिनरमध्ये आहाराचं संतुलन राखावं. – कुटू किंवा शिंगाड्याच्या पिठाची चपाती खावी. – साबुदान्याची खीर किंवा खिचडी खाऊ शकता. – सीताफळ, बटाट्याची रस्सेदार भाजी खाणं चांगलं राहील. – दिवसातून तीन वेळी फळं किंवा फ्रूट सॅलेड खावं. – ४-६ वेळा सुख्यामेव्यासह ज्यूस, दूध, मिल्कशेक पिणं चांगलं राहील. – नारळ पाणी आपल्या डाएटमध्ये अवश्य असू द्या – नवरात्रीच्या व्रतात कमीतकमी ८ लीटर पाणी प्यावं. – एकाच प्रकारच्या फळांपेक्षा मिक्स्ड फळं खावीत. – ताजी फळं खा, कडवट चवीचे फळं खाऊ नका.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..