नवीन लेखन...

दोन आठवडय़ात ४ किलो वजन घटवण्यासाठी वेट लॉस डाएट प्लॅन

* काबरेहायड्रेट्स आणि प्रोटिन्सचे मिश्रण असलेले जेवण दिवसातून ६ वेळा घेणे गरजेचे आहे.

रात्रीचे जेवण नेहमी हलके घ्या, ज्यात फायब्रस काबरेहायड्रेट्सचा समावेश असेल. सॅलड किंवा सूप, यांच्यासोबत मासे, चिकन, मलईरहित पनीर यांसारख्या प्रोटिनसमृद्ध पदार्थाचा समावेश करा.

* काबरेहायड्रेट्स, शर्करा आणि चरबी, सोडियमचे प्रमाण अधिक असलेल्या तळलेल्या पदार्थाचा समावेश जेवणात करणे टाळा.

* शरीरातील चरबी वेगाने घटवण्यासाठी ओमेगा ३ फॅट्सचा आहारात समावेश करा. अक्रोड, बदाम आणि फ्लाक्स सीड्सचा अंतर्भाव तुमच्या जेवणात करा.

* शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राहील याची काळजी घ्या. डिहायड्रेट झालेले शरीर वजन घटवू शकत नाही, त्यामुळेच किमान ३ लिटर पाणी दिवसाला प्यायलेच पाहिजे.

* संध्याकाळचे अति खाणे टाळून त्यांच्या जागी दाणे, गाजर, काकडी यांचा समावेश करा.

* ओट्स, बाजरी, ज्वारी, नाचणी, गहू, सॅलड, भाज्या आणि फळे यांसारखे फायबर असलेले कॉम्प्लेक्स काबरेहायड्रेट्स खाणे वजन घटवण्याची गुरुकिल्ली आहे.

* तुम्ही किती व्यायाम करता यावरही प्रत्येक आठवडय़ाला तुमचे वजन किती कमी होईल हे अवलंबून असते. आठवडय़ातील तीन दिवस वेट ट्रेिनग आणि तीन दिवस धावणे, पोहणे यांसारखी काíडओव्हॅस्क्युलर ट्रेनिग आठवडय़ातून ३ वेळा करणे गरजेचे आहे.

* मासे किंवा मटणपेक्षा चरबीचे प्रमाण कमी असलेले प्रोटिनयुक्त चिकन खाणे महत्त्वाचे आहे. शाकाहारींसाठी मलईरहित (स्किम्ड) दुग्धजन्य पदार्थ, दही आणि पनीर खाणे कधीही श्रेयस्कर.

* दिवसभर उपाशी राहण्यापेक्षा दर २ ते ३ तासांनी खाणे कधीही योग्य. त्यामुळे अधिकाधिक कॅलरी जाळण्यास मदत होते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..