नवीन लेखन...

तरच आपला निभाव लागणार हाय…………!!!

 

दोन सीमांवरचे,

दोन्हीही वैरी, झाडती फैरी,

तरी आपण गप्प बसावे काय?

गप्प बसण्याव्यतिरिक्त,

आपण दुसरे काय करणार आहोत की नाय?

किती दिवस लोकशाहीचे स्तोम माजवावे?

ह्याला काय कालगणना आहे की नाय?

षंढत्वाची धरुनी कास,

नकर्तेपणाची धरुनी आस,

मुत्सद्देगिरीची भाषा येथे कामाची नाही,

तोपर्यंत आपल्या जनतेची झाली त्राहि त्राहि,

एकाचा खून केला,

दुसर्‍याने सीमोलंघन केले,

तरी समोपचाराची भाषा वापरावी काय?

हे कलियुग आहे,

येथे गांधीगिरी चालणार नाय.

येथे हवी शिवबांची कठोरता,

येथे हवी सुभाष चंद्रांची नितीमत्ता,

येथे हवी सावरकरांची दैदीपत्यमानता,

येथे हवी भगतसिंघांची चपलता,

तरच आपला निभाव लागणार हाय,

तरच आपला निभाव लागणार हाय…………!!!

…………………………………….मयुर तोंडवळकर.

— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..