नवीन लेखन...

जागरुक ग्राहक

“काय हो शेठ, यावेळी तुमच्या जाहिरातींचा कागद चांगला का नाही वापरला?

नेहमी तर दर्जेदार असतो की.” शहरातील प्रसिद्ध कापड दुकानात थेट मालकाजवळ जाऊन विसुभाऊ बोलते झाले.

“अरे या या विसुभाऊ, बसा इथे.” अरे चहा घेऊन ये पाहू दोन. जाहिरातींच्या कागदाबाबत ही जागरुकता दाखविणारे ग्राहक भेटल्याने शेठ भलतेच खुष झाले.

चहा घेता घेता शेठ विसुभाऊंना म्हणाले,”त्याचं काय आहे विसुभाऊ, यावेळी त्या प्रेसवाल्याने चूक केली आहे, मी त्यांना बजावलंय की यापुढे खपवून घेणार नाही म्हणून. पण बाकी विसुभाऊ मी तुमच्या चोखंदळपणाला दाद देतो की, तुम्ही कागदाबाबत सुद्धा किती जागरूक आहात ते.”त्यावर चहाचा कप खाली ठेवत विसुभाऊ उत्तरले, “मग हो, लिहायला पाठकोरे वापरतो म्हणून काय झाले? त्यासाठीही मला दर्जेदारच कागद लागतो!”

— रमण कारंजकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..