नवीन लेखन...

किचन क्लिनीक – पालेभाज्या – आंबट चुका

आपण मसालेवर्गाची संपूर्ण माहीती पाहिली आता आपण वळूयात ब-याच मंडळींना न आवडणारा खाद्य गट म्हणजेच पालेभाज्या.

हा विषय घेणार हे एकूनच ब-याच मंडळींनी नाकं मुरडली असणार ह्यात शंकाच नाही.

लहान मुलांना देखील फारशी न आवडणारी आणी आयुर्वेद देखील सांगतो ८ दिवसातून फक्त एक ते दोन वेळेसच हि खावी.

ह्या पालेभाज्या देखील औषधी गुणधर्मयुक्त असतात बरेका त्यामुळे आजपासून आपण काही दिवस किचन क्लीनीक मंध्ये भाजीची मोहीम राभविणार आहोत बरे का!

आता सुरूवात करायची ना? चला तर मग पहिली भाजी पाहूयात.

पालेभाजी – आंबट चुका

हि भाजी प्रामुख्याने देशावर उगवते.ह्याचे झाड हातभर उंच असते.पाने कोमल असतात. चवीला आंबट असते.हि उष्ण असते त्यामुळे शरीरात वात कमी करते आणि कफ पित्त वाढवते.

आता हिचे औषधी उपयोग पाहूया:

१)पानांचा लेप गांधीलमाशीचा दंश झालेल्या भागी व सुजेवर करावा.

२)अपचना मध्ये जेवणाआधी तासभर चुका भाजी,आले,कोथिंबीर व कांदा घालून सूप करावे व ते प्यावे.

३)तोंड कोरडे पडणे,तोंडास चव नसणे,मुख दुर्गंधी ,दांतदुखी मध्ये चुक्याच्या रसाने गुळण्या कराव्यात.

४)चुका रस १ चमचा + कांद्याचा रस १ चमचा हे मिश्रण चामखीळांवर लावावे फायदा होतो.

५)गजकरणावर चुक्याच्या पानांचा रस लावावा.

हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ होते.

— वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४

वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
About वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर 202 Articles
वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचकर्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..