नवीन लेखन...

कलयुगातील गीता उपदेश

हस्तिनापुरात लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. पांडव आघाडीचे नेतेपद धर्मराजाकडे होते तर कौरव आघाडीचे नेतेपद दुर्योधनाकडे होते. पांडव आघाडीचा मातबर नेता अर्जुन दूरदर्शन वर दुर्योधानेच्या सभेत जमलेली लाखंची भीड पाहून संभ्रमात पडला. विश्वासू कार्यकर्त्यान कडून त्याला कळले

होते ‘साहेब या वेळी काही खर नाही’. निवडणूक हरलो तर भारीच बदनामी होणार व मंत्रीपद जाणार. नौकर चाकरांची फौज, सरकारी बंगला व लाल दिवेवाली गाडी पण जाणार. सुभद्रेला तर लाल दिव्यावल्या गाडीत बसायची भारीच हौस. आता काय करावे? निवडणूक लढवावी कि माघार घ्यावी? किंवा शेवट पर्यंत प्रयत्न करावा? काहीही ठरवण्याचा आधी कृष्णाचा सल्ला घ्यायला पाहिजे हा त्याने निश्चय केला.कृष्ण द्वारकेचा मुख्यमंत्री होता. द्वारका जम्बुद्विपातील सर्वात श्रीमंत राज्य होत. एका गुराख्याचा पोरा पासून कृष्ण या पदावर पोहचला होता. आपल्या राजनीतिक कारगर्दीत त्याने मोठ्या- मोठ्या नेत्यांना धूळ चाटविली होती. प्रतिकूल परिस्थितीही आपल मुख्यमंत्रीपद कायम ठेवलं होत. कोणालाही ‘रंका पासून राजा बनवू शकतो ही कृष्णाची ख्याती होती. लोक प्रेमाने त्याला राजनितीताला ‘योगीराज’ म्हणत. कृष्ण आपल्याला अवश्य

करेल ही अर्जुनाला खात्री होती कारण “सारी खुदाई एक तरफ जोरू का भाई एक तरफ”. अर्जुन सुभद्रे समवेत तो कृष्णाला भेटायला द्वारकेला गेला. अथ गीता उपदेश

अर्जुन म्हणाला ” हे योगीराज, मी संभ्रमात आहे. काय कराव हे सुचत नाही. कृष्ण वदला” अर्जुना तुझा मजवर विश्वास असेल तर तुझा संभ्रम मी आताच दूर करतो? पण एक सांग, पांडव जिंकले तर प्रधान मंत्री कोण बनेल? तुला काय मिळेल? अर्जुन ” धर्मराज प्रधान मंत्री बनेल. मला मंत्री पद मिळेल. “आणि कौरव जिंकले तर”?दुर्योधन प्रधान मंत्री बनेल? आणि

आम्हाला विपक्षात बसावे लागेल. ‘ही मुख्य समस्या आहे तर’ कृष्ण हसत म्हणाला, पण चिंता नको करू तू माझा मित्र व मेहुणा आहे तुझी गादी कायम राहील.अर्जुनाला कृष्णाच्या बोलण्याचा रोख कळला, निवडणुकीच्या वेळी धर्मराजाची दगाबाजी ! जमणार नाही. लोक काय म्हणतील. दुर्योधनाला शरण जाऊन त्याचा दरबारात हात बांधून उभे राहण ! छे छे कल्पना करवत नाही. शिवाय हा अधर्म आहे. अर्जुन नेहमी धर्माच्या मार्गावर चालत राहिला आहे. गादी मिळाली नाही

तरी चालेल, अर्जुन वनवास पत्करेल, पण दगाबाजी करणार नाही. दुर्योधनाच्या पक्षात जाणार नाही.

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..