नवीन लेखन...

युवकांनो आध्यात्मात समरस व्हा !

आजच्या या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात युवकांनो आध्यात्मात समरस व्हा ! असे म्हटल्यानेबहुतांशी युवक गोंधळून गेले असतील, यात शंका नाही.

सर्वांना असा प्रश्न पडला असेल की, आजच्या संगणकाच्या प्रगत युगात आध्यात्मासारख्या जुनाटव मागासलेल्या विषयाला पुढे आणून मी युवकांची दिशाभूल करत आहे. किंवा अंधश्रध्देला खतपाणी घालत आहे. आदि आदि.

पण खरचं आध्यात्म मागासलेलं, बुरसटलेलं आहे का ? यावर आपण कधी संशोधन केले का? आध्यात्माला कधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला का ? हे प्रश्न जर आपण आपल्यामनाला विचारले तर उत्तर नाहीच येईल ! याची खात्री आहे. पण तरी सुध्दा आपण आध्यात्मालाविनाकारण नावे ठेवतो, हा विरोधाभास म्हणावा की अंधश्रध्दा हेच समजत नाही. परंतु आपण आध्यात्माला नावे ठेवतो. हे मात्र सत्य आहे, याचे कारण म्हणजे दुसरे विदेशी किंवा युरोपियम्हणतात आध्यात्म वाईट म्हणून आपण ही म्हणतो वाईट. आपण आपली बुध्दि तर त्यांच्याकडेगहाण टाकलेली आहे ना ! म्हणून ती वापरण्याचा किंवा स्वत:चा असा वेगळा विचार करण्याचाप्रश्नच निर्माण होत नाही.

पण हेच युरोपिय लोक जेव्हा आमच्या शास्त्राचे संशोधन करतात, त्याची व्याप्ती व महत्वजाणतात, तेव्हा आम्हाला ते नव्याने समजते व आम्ही त्याचे अनुकरण करतो. जसे आमचे’योगशास्त्र’  आम्ही ‘योगा’ म्हणून स्विकारले, आमचे ‘आयुर्वेद शास्त्र’ आम्ही ‘आयुर्वेदा’ म्हणूनस्विकारले, तसेच आता आमचे ‘आध्यात्म शास्त्र’ आम्ही ‘आध्यात्मा’ म्हणून स्विकारणार की,काय ? याची भीती वाटते. कारण नुकतेच न्यासाने एका संशोधनाद्वारे आपल्या वैदिक गायत्री मंत्राचीस्पंदने जगातील इतर सर्व मंत्राच्या स्पंदनापेक्षा जास्त व सकारात्मक उर्जा वाढवणारे आहेत, हे मान्यकेले आहे. तर दुसरे म्हणजे भारतातील जेवढे दत्त क्षेत्रे आहेत, ज्यात गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर,औंदुबर वाडी, गिरणार पर्वत आणि अक्कलकोट आदि ठिकाणी काही तरी विशेष उर्जा त्यांनाआपल्या सेटेलाईट उपकरणाद्वारे दिसली. तर तिसरी गोष्ट म्हणजे भारत श्रीलंका दरम्यानअसलेल्या रामसेतूचे नासाने मान्य केलेले अस्तित्व आणि चौथे म्हणजे संस्कृत ही भाषा अंतराळातसंशोधनासाठी सर्वोत्तम भाषा आहे, हे त्यांनी मान्य केले. अशा अनेक घडामोडी आज घडत आहेत.ज्यातून आध्यात्माची नव्याने ओळख व अस्तित्व समोर येत आहे, ही निश्चितच खुप गौरवपुर्ण बाबआहे. ही झाली आध्यात्माची एक महत्वाची बाजू.

मात्र आज काही आध्यात्मातीलच पाखंडी, भोंदुबाबा, बुवाबाजी मूळे अनेकांच्या मनातआध्यात्माविषयी गैरसमज निर्माण झालेला आहे. अशा भोंदुगिरी मुळे बऱ्याच वेळा आपल्याश्रध्देला तडा बसतो, आपली फसवणुक होते, आपल्याला लुटले जाते. पण याचा शास्त्रशुध्दआध्यात्माशी काही एक संबंध नाही. या पाखंडी लोकानी सांगितलेले आध्यात्म व शास्त्रीयआध्यात्म यात दोन टोकाचे अंतर आहे. हे पाखंडी लोक स्वत:चे महत्व वाढवतात, संपत्तीवाढवतात. आपल्या खऱ्या हेतुपासून सर्वांना अंधारात ठेवून लोंकाच्या श्रध्देच्या बाजार मांडतात.तर शास्त्र शुध्द वैदिक आध्यात्म हे स्वत:ची ओळख नष्ट करायला शिकवते. जीवनातील अंधकारनष्ट करते. वैदिक आध्यात्म आपल्याला सर्व मोह-पाशातून मुक्त करते. कारण शुध्द आध्यात्मम्हणजे शाश्वत ज्ञानप्राप्ती होय. आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन होय. शुध्द आध्यात्म म्हणजेचैतन्य होय, शुध्द आध्यात्म म्हणजे चिरतंन शांती होय, शुध्द आध्यात्म म्हणजे समर्पण होय. शुध्दअथवा वैदिक आध्यात्म म्हणजे सुख-दु:खाच्याही पलिकडील परमानंदाची प्राप्ती होय. असेआध्यात्मिक गुढ ज्ञान ज्यांना ज्यांना मिळवता आले ते जितेद्रिंय, निश्चल आणि स्थितप्रज्ञ झाले.अशा महान विभूतीनांच आपण आज ऋषी-मुनी, तपस्वी आणि संत म्हणून ओळखतो. असे हेमहापुरूष म्हणजे आध्यात्म विश्वातील तेजस्वी तारे होत. यांनी जगत् कल्याणासाठी आपल्याप्रपंचाची व संपत्तीची राख रांगोळी करून समाज प्रबोधन केले. तर आज काही महाठग, स्वंयभूबाबा, महाराज लोक याच विभूतींच्या नावाने हजारो लाखो रूपये कमावत आहेत, हे खुप मोठे दुर्दैवआहे. असो.

आज काही उच्च शिक्षित व स्वत:ला विद्वान समजणारे लोक वरील ढोंगी लोकामुळेआध्यात्माला अंधश्रध्दा मानतात. पण आध्यात्म म्हणजे अंधश्रध्दा नसून सुखी आणि समाधानीजीवनाची गुरूकिल्ली आहे. आध्यात्माचा उगम हा श्रध्दा किंवा अंधश्रध्दा याच्या हजारो वर्ष पुर्वीचाआहे. सजीव सृष्टीच्या उगमा पुर्वीपासून आध्यात्म अस्तित्वात आहे. आध्यात्म ही परमात्म्याचीप्रथम निर्मिती आहे, हे आपण प्रथम ध्यानात घ्यावे.  आता आध्यात्माच्या खरेपणा विषयीकळाल्यानंतर मग परत प्रश्न असा पडतो की, परमात्मा किंवा परमेश्वर प्रत्यक्षात आहे अथवा नाही? तेव्हा आपण याच्या जास्त खोलात न शिरता याबाबतीत परम तपस्वी, महाज्ञानी, सिध्द पुरूषआणि स्वामी विवेकानंद यांचे गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे विचार जाणून घेऊ. श्री रामकृष्णम्हणतात,”रात्री आकाशात किती तरी तारे दिसतात, परंतु सकाळी सूर्य उगवल्यावर ते दिसत नाहीत.पण तुम्ही असे म्हणू शकता काय की, दिवसा आकाशात तारे नसतातच मुळी ? लोक हो, अज्ञानअवस्थेत परमेश्वराचे दर्शन होत नाही. म्हणून असे म्हणू नका की, परमेश्वर नाहीच !” याचाचमतितार्थ म्हणजे या जगात परमेश्वर नांदतो.

आजच्या यांत्रिक युगात जीवन व मृत्यू हे एकमेकांचा पाठलाग करत आहेत. यात मृत्यू कधीआपला डाव साधेल, हे सांगणे कठिण आहे. तेव्हा युवकांनी तात्काळ आध्यात्माचा अंगिकारकरावा. आध्यात्माने युवकांत नवचैतन्य निर्माण होईल. यातून समाजाचे व देशाचे भले होईल.युवकातील स्वैराचार व बेशिस्तपणा दूर होईल. आपण आपल्या देशाचा गौरवपुर्ण इतिहासपाहितल्यास आपल्या असे लक्षात येईल की, आध्यात्मातूनच आपला देश पुढे आलेला आहे.आध्यात्मानेच आपल्याला एक नवी दिशा दिलेली आहे. आपल्या प्राचीन ऋषी-मुनींनी केलेले संशोधन म्हणजे आजचे प्रगत विज्ञान होय. आपल्या प्रत्येक प्राचीन गोष्टीत विज्ञान लपलेले आहे. फक्त त्याला आध्यात्मिक झालर लावून व भिती घालून आपल्याला सांगितले जाते. म्हणूनआपल्याला त्या अंधश्रध्दा वाटतात. यावर पुढे सविस्तर चर्चा होईलच. एवढे उच्च व प्रगतशीलआपले आध्यात्म आहे. म्हणून आध्यात्माला मागासलेले किंवा अज्ञानीपणाचे न लेखता युवकांनीआध्यात्मात समरस होऊन देशाचा व स्वत:चा सर्वतोपरी विकास साधावा.

— सुनिल कनले

सुनिल कनले
About सुनिल कनले 16 Articles
श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..