नवीन लेखन...

खराब रस्ते

आपल्याकडे दरवर्षी नेमके पावसात किंवा पावसाच्या आधी रस्ते खराब होत असतात. खड्डे पडतात. प्रवासाला निघतांना आपण म्हणतो “ पावसाचे दिवस आहेत, रस्ते खराब झाले असणार – लवकर निघूया.“ अशी मानसिकता आपल्यात का आली? आपण मान्य करून घेतले कि पावसात रस्ते खराब असायलाच हवेत. परदेशी पण बर्यापैकी पाऊस पडतो तेथे का नाही रस्ते खराब होत?

खराब होणारे रस्ते पाहून मला पडलेले काही प्रश्न

– रस्ते प्रत्येक वर्षी खड्ड्यात का जातात?

– एवढे खड्डे रस्त्याला का पडतात?

– रस्त्यात खड्डे असतात कि खड्ड्यात रस्ते?

– बोटीत बसत नाहीत एवढे धक्के आणि हेलकावे ह्या रस्त्यावरून जातांना का बसतात?

– खड्ड्यामुळे इंधन आणि वेळ जास्त लागतो आणि गाडी खराब होते ह्याला जबाबदार कोण?

– खड्ड्यांमुळे अपघात होतात, लोक जखमी होतात आणि कधी कधी काही लोक जीव गमावतात, त्याला जबाबदार कोण?

– मंत्री आणि संत्री ह्या रस्त्याने प्रवास करतात का? की त्यांना सचिव सांगतात “साहेब रस्ता खराब आहे, हेलिकॉप्टर ने जा“

– रस्ते असे दरवर्षी खराब होऊ नये म्हणून सरकारतर्फे काय उपाययोजना केली जाते? ती व्हावी म्हणून स्थानिक संस्थाकडून आणि जनतेकडून सरकारची काय अपेक्षा आहे?

– रस्ते खराब झाल्यास ठेकेदारांकडून पेनल्टी घेण्याची काय तरतूद आहे? अशी तरतूद आहे का?

– जनतेकडून रोड टॅक्स, टोल घेतला जातो, नोकरदार आयकर भरतात त्याबदल्यात चांगल्या रस्त्यांची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का ?

– जर पावसात रस्ते खराब होतात तर पावसाच्या आधी मार्च एप्रिल मध्ये हे सगळे रस्ते टकाटक का केले जात नाहीत? भर पावसात, रहदारी चालू असतांना खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रकार का केला जातो?

– खराब रस्त्यामुळे साधन संपत्तीचा किती अपव्यय होतो ह्याचा हिशोब कधी कोणी ठेवलाय का ?

अशा रस्त्यावरून परदेशी प्रवाशी प्रवास करताय तेव्हा ते राष्ट्रीय महामार्गावरून जात आहेत ह्यावर विश्वास ठेवत नाहीत. ज्या देशात दळणवळण करणारे महामार्ग असे आहेत तो देश महासत्ता कसा आणि कधी होणार?

प्रकाश दिगंबर सावंत, पुणे
९०४९००८५०३

 

प्रकाश दिगंबर सावंत
About प्रकाश दिगंबर सावंत 11 Articles
विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी. जन्म मुंबई चा. प्रवासाची आवड. विक्री विभागात अधिकारी असल्याने देश विदेशात प्रवासाची संधी प्राप्त. प्रवासादरम्यान लोकांचा स्वभाव आणि लोक परंपरा जवळून पाहण्याची संधी. सध्या मुक्काम पुण्यात. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. इतिहास, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..