नवीन लेखन...

शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल

आपण आपल्या शरीराच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या पाण्याबद्दल माहिती घेऊया. “अन्न हे पूर्ण ब्रह्म” हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या शरीराची वाढ ही आपण घेत असलेल्या पौष्टिक व संतुलित आहारावर अवलंबून असते. अन्नाप्रमाणेच एक महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपल्या शरीराची चयापचय क्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते ते म्हणजे “पाणी”.

आपल्या शरीरात पाण्याची मात्रा ७०% आहे. दिवसभरात येणार घाम, लघवीद्वारे, श्वसनक्रिया ह्यांमार्फात सतत आपल्या शरीरातील पाण्याची मात्रा कमी होत असते. म्हणूनच दिवसाला ७-८ ग्लास (अंदाजे २ लिटर) पाणी पिणे गरजेचे आहे. साधारण २० किलो वजनाच्या व्यक्तीला दिवसातून १ लिटर पाणी पिण्याची गरज असते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यावरून आपण आपला पाणी पिण्याचा अंदाज सहज लावू शकतो. पाण्यामुळे आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते व दिवसभरात येणारा थकवा कमी होण्यास मदत होते.

योग्य प्रमाणात योग्य वेळी पाणी घेतल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शरीरातील विषारी द्रव्य (toxins) बाहेर टाकण्यास पाणी मदत करते. सकाळी उठल्यावर पाणी पिण्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची क्रिया सुरळीतपणे पार पडते. पाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हृदयाला आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला नियमितपणे व योग्य प्रमाणात रक्तपुरवठा करण्यास पाण्याची मदत होते. फळे म्हणजे पाण्याचा नैसर्गिक स्रोत आहे. फळांमध्ये जीवनसत्त्व व खनिजे असतात. फळ आणि पाणी ह्यांच्या योग्य समन्वयाने आपली त्वचा मुलायम व उजळ राहण्यास मदत होते.

दिवसभराच्या कामामध्ये व्यस्त असताना एकाच वेळेस भरपूर पाणी पिणे किंवा पाणी खूपच कमी प्रमाणात पिणे हे दोन्ही आरोग्यासाठी घातकच आहे. दिवसभरात एकाचवेळी पाणी पिण्यापेक्षा दर काही तासांनी पाणी पिण्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही. बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते किंवा पाण्याच्या घोटाबरोबर जेवायची सवय असते. पण संशोधनात असे आढळून आले आहे की, जेवणानंतर लगेच पाणी पिण्याने किंवा जेवताना सतत पाणी पिण्याने शरीरावर कालांतराने वाईट परिणाम होतात.

जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्यामुळे खाल्लेलं अन्न पचण्यास बाधा निर्माण होते आणि पोट सुटण्याचा संभव असतो, ज्यामुळे भविष्यात ते विविध आजारांसाठी निमंत्रण ठरू शकते. म्हणूनच जेवणाआधी आणि जेवणानंतर अंदाजे ३० मिनिटांनी पाणी प्यावे. रात्रीपेक्षा दिवसभरात प्रमाणात पाणी पिणे शरीरासाठी योग्य असते. दिवसा वेळ मिळत नाही म्हणून अवेळी पाणी पिणे शरीरासाठी अयोग्य आहे. योग्य वेळी व योग्य प्रमाणात पाणी पिण्याने आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते आणि बऱ्याच आजारांचे उगम स्थान असलेल्या पोटाच्या समस्याही दूर होण्यास मदत होते.

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..