नवीन लेखन...

वानखेडे स्टेडियम

वानखेडे स्टेडियम म्हणजे ‘भारतीय क्रिकेटची पंढरी.’ इंग्लंडमध्ये जसे लॉर्ड्सला महत्त्व आहे, तसेच भारतात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला. वानखेडे स्टेडियम २०११ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यासह अनेक ऐतिहासिक सामन्यांचे साक्षीदार आहे.

गेल्या चार दशकांपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांची मुंबईकरांना मेजवानी देणाऱ्या या स्टेडियमला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष एस.के. वानखेडे यांचे नाव देण्यात आले होते.

२३ ते २९ जानेवारी १९७५ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला गेला. हे कसोटी क्रिकेटमधील जगातील ४८ वे मैदान ठरले. वेस्ट इंडिज विरुद्धचा हा सामना भारताने २०१ धावांनी गमावला. वेस्ट इंडिजने ती मालिका ३-२ अशी जिंकली. विंडीज कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांची कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट २४२ नाबाद ही खेळी याच सामन्यातली. त्यांना बिशनसिंग बेदी यांनी शून्यावर जीवदान दिले होते.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..