नवीन लेखन...

विझलेल्या दिव्याची महती

माणसाने विझलेले दिवे सुध्दा पहायचे असतात, मग तेजाळणार्‍या दिव्याची महती समजते. तेजाच्या वलयाची जाणीव होते.दिवे जळून विझले की त्यांची असहायता समजते. ते का विझले असावेत याचा अंदाज घेता येतो. विझलेल्या दिव्यांची वेदना समजून घेता येते.

आपण जेंव्हा वेदनेच्या परिछायेत असू त्यावेळची जाणीव होते. आणि तस पाहिले तर प्रत्येक दिव्याला विझावच लागत. कधी वेळ आल्यावर तर कधी अवेळी पण.दिवे जेंव्हा प्रकाशमान असतात तेंव्हा प्रत्येकाला ते आवडतात. पण याचा अर्थ असा नाही की अंधार उपयोगी नसतो. अंधार पण वेदनेला पोटात जागा देतो.आसवं मुक्तपणे ओघळू देण्यासाठी अंधाराएवढी सुरक्षित जागा कोणतीही नाही.

अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. वेदना आहे म्हणून आनंदाला महत्व आहे. प्रकाश हा अंधारातून जन्म घेतो. म्हणून विझलेला दिवासुध्दा आपण पहायलाच हवा तरच तेजोमय दिव्याचे महत्त्व कळेल.

— दीपक गायकवाड
आदित्य ॲकॅडमी
अखंड महाराष्ट्र विद्यार्थी चळवळ

Avatar
About दीपक गायकवाड 33 Articles
दीपक गायकवाड हे महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईन स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी- "आदित्य ॲकॅडमी" चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तथा संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..