नवीन लेखन...

विझलेली पणती

संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे
आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे
दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे
दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे ।

पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे
कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे
आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे
गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे ।

दिवाळी संपली महत्त्व संपले हे असेच सुरु आहे
माणूस काय पणती काय नशिबी भोग तोच आहे
ऊपयोग संपून गेल्यावर किंमत त्याची शून्य आहे
घरातील एखादा कोपऱा हीच खरी जागा आहे ।

— सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
१२ नोव्हेंबर २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..