नवीन लेखन...

विनाश – ईश्वरी व मानवी

संतुलन  करूनी चालवी,  निसर्गाचा खेळ सतत  ।

जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत  ।।

जन्म घटना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी  ।

नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी  ।।

मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होऊनी दु:ख करी  ।

मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त  येई शिसारी  ।।

पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही संकटे  ।

मानव निर्मित युद्ध दंगली,  सूड भावना तेथे पेटे  ।।

विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे  ।

बिघडले घर देईल बांधूनी,  विश्वास बाळगी ईश्वराकडे  ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..