नवीन लेखन...

श्रेष्ठ गायक नट भाऊराव कोल्हटकर

मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट भाऊराव कोल्हटकर यांचा जन्म ९ मार्च १८६३ रोजी झाला.

भाऊराव कोल्हटकर हे बडोदे येथील पोलीस आयुक्तांच्या कचेरीत साधे कारकून असले, तरी एक उत्कृष्ट गायक म्हणून त्याकाळी बडोद्यात त्यांची फार प्रसिद्धी होती. सुंदर रूप आणि गोड आवाज हे त्यांचे गुणविशेष. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० रोजी संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून संगीत मराठी रंगभूमीची स्थापना केली. २० सप्टेंबर १८८२ रोजी भाऊरावांनी वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्याकाळी किर्लोस्करांच्या शाकुंतल नाटकात शकुंतला’, सौभद्र नाटकात ‘सुभद्रा’ व रामराज्यवियोग नाटकात ‘मंथरा’ या भाऊरावांच्या स्त्री भूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘सुभद्रे’ची भूमिका तर त्यांनी १८८३ ते १८९७ या चौदा वर्षांच्या काळात अखंडपणे केली. महाराष्ट्रातील घराघरांतून त्यांच्या नावाचा उल्लेख आत्मीयतेने ‘भावड्या’ असा होऊ लागला. गोविंद बल्लाळ यांच्या विक्रमोर्वशीय नाटकांत ‘उर्वशी’ची भूमिका (१८८९) केल्यानंतर भाऊरावांनी नायकाच्या भूमिका करण्यास सुरुवात केली. देवल यांच्या शापसंभ्रम नाटकातील ‘पुंडरीक’ (१८९३) व मृच्छकटिक नाटकातील ‘चारुदत्त’ (१८९५); श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या पहिल्यावीरतनय नाटकातील ‘शूरसेन’ (१८९६) आणि देवलांच्या शारदा नाटकातील ‘कोदंड’ (१८९९) या भाऊरावांच्या लोकप्रिय व गाजलेल्या पुरुषभूमिका होत. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या मृत्यूनंतर (१८८५) ते किर्लोस्कर नाटक मंडळीचे भागीदार मालक झाले. अण्णासाहेब किर्लोस्करांनी स्थापन केलेल्या संगीत रंगभूमीची परंपरा त्यांनी आपल्या १८–१९ वर्षांच्या कारकीर्दीत चांगल्या प्रकारे समृद्ध केली.

भाऊराव कोल्हटकर यांचे १३ फेब्रुवारी १९०१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4231 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..