नवीन लेखन...

वाटा वेड्या वाकड्या

वाटा वेड्या वाकड्या
हरवून साऱ्या गेल्या
ओल दव भिजल्या वनी
प्राजक्त फुलांत हरवल्या..
गंध मंद आल्हाद दरवळे
पावलोपावली बहर खुणा
देह भिजल्या हळव्या मनी
पर्ण ऋतूंचा मोहर नवा..
मन अलवार धुंद मोहरे
पर्ण पाचूचा हिरवा नजारा
ओल हळव्या एकांत क्षणी
रक्तीमा गाली विलसे लाजेचा..
वसंताचे आगमन होता
ऋतुराज बेधुंद बहर मना
वसंताचे हलकेच साज लेणे
सजली वसुंधरा मोहक जरा..

— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..