नवीन लेखन...

ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस

सबनीस कुटुंब मूळचे पुसाळकर. कोकणातल्या पुसाळहून देशावर आलेले. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी सोलापूर येथे झाला.

पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. ‘घरोघरी हीच बोंब’, ‘कार्टी श्रीदेवी’, या नाटकांबरोबरच, ‘विच्छा माझी पुरी करा’ सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.

नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ‘गेला माधव कुणीकडे’ सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, ‘कलावैभव’ संस्थेला यश देणारे नाटक, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’ सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. ‘घरोघरी हीच बोंब’ ’निळावंत’, ‘नाटक’ नावाचेचे नाटक तसेच ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘गेला माधव कुणीकडे’, अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. ‘सबनिशी’ हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, ‘थापडया’, ‘पखाल’, हे विनोदी कथासंग्रह, तर ‘माझेश्वरी’ हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.

मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही ‘विच्छा’ मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून ‘विच्छा’ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी ‘तुका म्हणे’ मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली.

‘छपरी पलंगाचा वग’, म्हणजेच ‘विच्छा’ हे नाटक, त्यांची १८ नाटके व एकांकिका प्रसिध्द झाल्या, विप्छा माजी पुरी करा, कार्टी श देवी, घरोघरी हीच बोंब, निळावंती, म्हैस येता माझ्या घरा, सौजन्याची ऐशी तैशी, मेजर चंद्रकांत, अप्पाजींची सेक्रेटरी, हे ही दिवस जातील, प्रेक्षकांनी क्षमा करावी, घरमालक, यम हरला यम जिंकला. त्यांचे एकूण १२ कथा संग्रह प्रसिध्द झाले, बोका झाला संन्यासी, पसंद अपनी अपनी, गुदगुल्या, विनोद द्वादशी, परसूच्या पशुकथा, थापाड्या, खांदेपालट, पानदान, गारुड, पंगत, परवाळ, आलपड. त्यांची दोन पुस्तके, पहिलं `माझेश्वरी’ दुसरं `सबनीशी`.

जयवंत दळवींच्या निवडक ठणठणपाळचे संपादन ही त्यांनी केलं. त्यांच्या दोन विनोदी नाटयकृतींना १९६३ व १९७२ सालचे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार लाभले. ते काही काळ किशोर मासिकाचे संपादक होते. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंत सबनीस यांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. `खणखणपूरचा राजा’ या वगनाट्यापासूनच दादा कोंडके, वसंत सबनीसांची जोडी जमली. आणि ‘सोंगाडया’ रूपेरी पडदयावर आला.

‘एकटा जीव सदाशीव’ सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. सचिन बरोबर त्यांचे ‘नवरी मिळे नव-याला’, ‘गंमत जंमत’, ‘एकापेक्षा एक’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट

विच्छा माझी पुरी करा नाटक
https://www.youtube.com/watch?v=08xqwTnglME

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..