नवीन लेखन...

तबल्याचा जादूगार उस्ताद अल्लारखा खान

उस्ताद अल्लारखा खान यांना तबल्याचा जादूगार अस म्हटल जाते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९१९ रोजी फगवाल जम्मू येथे झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासून अल्ला रक्खा खान यांच तबल्याशी नात दृढ झाल होते. उस्ताद अल्लारखा खान यांनी आपली कारकीर्द १९४० साली मुंबई आकाशवाणी चे स्टाफ़ आर्टिस्ट म्हणून केली.तेव्हा लोकांना तबला हे फक्त संगीतातील वाद्य आहे अशी धारणा होती. ही धारणा अल्ला रक्खा खान यांनी बदलली. १९४५ ते १९४८ हिंदी चित्रपटाला संगीत दिले पण ते बॉलीवूड मध्ये यशस्वी झाले नाहीत. उस्ताद अल्लारखा खान यांनी बड़े ग़ुलाम अली ख़ाँ, उस्ताद अलाउद्दीन ख़ाँ, पंडित वसंत राय व पंडित रविशंकर यांना खूप वेळा तबल्याची साथ केली. उस्ताद अल्लारखा खान यांनी भारत व विदेशात तबल्याला एक स्वतंत्र वाद्य म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. भारत सरकारने १९७७ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.१९८२ साली संगीत नाटक अकादमी अवार्ड त्यांना मिळाले होते. त्यांचे शिष्य त्यांना अब्बाजी म्हणत. उजवा तसेच डावा असे दोन्ही हातांचा उत्तम समन्वय साधत तबलावादन करणे ही मा. अल्ला रक्खा खान यांची विशेषता होती. अल्ला रक्खा खान यांना तीन मुले, झाकीर हुसेन, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी.

झाकीर हुसेन आणि र्फ्क्युनिस्ट तौफिक कुरेशी लोकांना माहिती आहेत. पण तबलावादक फझल कुरेशी नेहमीच लो-प्रोफाइल राहिले आहेत. मुंबईत क्लासिकल संगीताची नवी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी ते पार पाडत आहे. जेव्हा जेव्हा पंजाब घराण्याची चर्चा होते तेव्हा उस्ताद अल्लारखा खान यांच्या नावाची चर्चा होते. त्यांच्या निधनानंतर तबल्याच एक युग संपले अस म्हणतात. मा. उस्ताद अल्लारखा खान यांचे ३ फेब्रुवारी २००० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..