नवीन लेखन...

त्याला हवा तसा हवा तेव्हा

त्याला हवा तसा हवा तेव्हा त्याचा
टाईमपास तिच्याबरोबर झाला
तिच्या दुखऱ्या मनाच्या अजून
मग चिंधड्या लाख उडल्या..
आता ती किती चूक हेच
फक्त त्याच्या लेखी उरलं
कितीही अपमान त्याने केले
तरी तीच दुःख त्याला न कळलं..
मन आणि भावनांची तिची कहाणी
त्याला कधी कळणार नाही..
तिच्या मनाची जाणिव त्याला
दिसणार कधीच ती नाही..
त्याचा ती टाईमपास झाली
तिला तो आवडला हीच चूक तिची झाली
तो पुरुष आणि ती स्त्री हाच फरक उरला
तिच्या मनाचा गाभा त्याला न कळला..
प्रश्न मिटवले लोकं आयुष्यातून खोडूनी
तरी आठवणी मिटत कधीच नाही
बहर कसाही असो मनाचा ओला
ऋतुचक्र बदलते पण मन पुन्हा उमलत नाही..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..