नवीन लेखन...

त्या सांज सावल्या किरण सोनेरी

त्या सांज सावल्या किरण सोनेरी
एकांत मनास जाईल मोहवूनी
कितीक आठवणींचा पसारा पसरुनी
हरवल्या वाटा माखून धूळ वारा धुसरल्या सांजवेळी
किरणांच्या रांगोळीचा आकाशी सजला सोहळा
तो रवी अस्त आज अवचित झाकोळला
निमिष क्षणभर थांबले मेघ भरलेले
डोळ्यांत अलगद पाणी ओथंबलेले
वळचणीस सांधले कुड कौलारु काही
कवडसे प्रकाशले गर्त भाव वेळी
पागोळीत थेंब पाण्याचे साचले काही
उमळल्या आठवणी मनात काहूर दाटी
जीव जिव्हात जिव्हारी लागला
भाव व्याकुळ घन भरल्या मेघ धारा
मेघांच्या रिक्त धारेत थेंब एक हरवला
त्या क्षणी आठवणी स्तब्ध आल्हाद झाल्या
वाटा काटेरी बोचल्या वाटेवरती
अलगद पाऊल चालता काही
गेले गोत आप्त लांब हरवुनी
रंगले पान परी ओठ शुष्क ओल वेळी
काव्यांत गूढ अनामिक व्यक्तता दाटली
आठवणींच्या झुल्यावर एक रेघ उमटली
निःश्वास सुटले परतून जखमा डोही
या मनाचे त्या मनाशी गूज साधूंनी
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..