नवीन लेखन...

तूच तार सहज छेडली रे

तूच तार सहज झेडली रे
अन अलवार मी उलगडले,
तुझ्या स्वप्न मिठीत आता रे
मी पुरती तुझ्यात गंधाळले..
सहज विसरायचं म्हणलं
तरी अधिक आठवण येते,
अन त्या वेल्हाळ स्वप्न मिठीत
मी पुरती बैचेन अर्ध्या रात्री होते..
सहज विसरायचं सारं मग
निर्जीव मी बाहुली नाही रे,
मन न ताब्यात राहतं कधी रे
परी वेदनेचे घाव नको आता रे..
भूल पडली तुझी अचानक
नकळत तुझ्यात मी गुंतले,
दोष असेल लाख कसला तो
न चालते इथे कुणाचे काही रे..
चांदण्याचा सडा निल अंबरी
त्यात तुझा मोह अधिक होतो,
व्यक्त झाले मनस्वी मी कधीच
वेदनेचा सल उरात आता मिटतो..
अल्लड बावरी झाले मी रे
वळणावर वाट वाकडी होता रे,
का गुंतले तुझ्यात हलकेच रे
मोह मनाचा दोष अंतरी मला रे..
भावनेच्या ओल्या बहरात
एक गुलाब फुलला रे,
स्पर्श तुझा असेल मोहक
धुंद जीव त्यात मोहरला रे..
तुटतो तारा अलगद असा
डोळ्यांत सर अश्रूंची जमते,
न कळतात वेदना मग गुलाबाच्या
नशिबात गुलाबाच्या काटेच अधिक रे..
अल्पजीवी असतो गुलाब
कोमेजून जातो तो लगेच रे,
गुलाब हाती धरता मज मिळाले
तुझ्या आर्त आठवणींचे काटे रे..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..