नवीन लेखन...

आपल्या आयुष्यात पाण्याचे काय महत्व आहे

शरीरातील आम्लाचा प्रभाव कमी करण्यासाठी दिवसभरात चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करून जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर देणे, शरीरासाठी केव्हाही उपयुक्त ठरते. दिवसभरात कुठलेही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा पाणी पिण्यावर आपण भर देणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होईल.

कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा नारळपाणी किंवा लिंबूपाणी पिणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले. नारळ पाण्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा प्राप्त होऊन शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. सकाळी नारळपाणी पिणे हे जास्त फायद्याचे ठरते. जर आपण सकाळी नारळपाणी घेतले तर दिवसभर आपल्यामध्ये उत्साह कायम राहतो. नारळपाणी नियमित पिण्यामुळे आपली त्वचा कोरडी न पडता तिच्यामध्ये ओलावा कायम राहतो.

लिंबामध्ये सी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. योग्य प्रमाणात लिंबू पाण्याच्या सेवनाने सर्दी-खोकल्याची समस्या कमी व्हायला मदत होते. तोंडातून दुर्गंधी येत असल्यास लिंबू पाणी पिण्याने तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास मदत होते. त्याचबरोबर तोंडही कोरडे पडत नाही. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याने घसा कोरडा होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

लिंबू पाणी पिण्याने चयापचय क्रिया सुधारते. लिंबू पाण्याच्या  सेवनाने वजन कमी होण्यास मदत होते. नैसर्गिक पाणी किंवा पाण्याचे स्रोत म्हणजे फळे, नारळपाणी अथवा लिंबूपाणी ह्यांच्या सेवनाने आपण आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा करू शकतो. योग्य प्रमाणात पाणी पिण्याने शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहते. अशाप्रकारे योग्य वेळी योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

— संकेत प्रसादे

Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..