नवीन लेखन...

ठरवलं होतं खुप काही

ठावूक होतं ठरलेलं कधी होत नाही,
म्हणूनच ठरवलं नव्हतं काही काही ।
नव्हते मनीं माझ्या, तसेंच नव्हते ध्यानींही,
पिंडच नव्हता ठरविण्याचा कधी काही ।।

केव्हांच गेला सांगून पार्थ सारथी सर्वकाही,
करावी सदा मनोभांवे सत्याचीच कार्यवाही ।
ठरविण्याची काही, नव्हती म्हणून मजसि घाई,
कृतीशीलतेतुनि साथीस होती त्याचीच परछाई ।।ठेवूनि निष्ठा तयांवरी, सदैव मग्न मी कार्यीं,
राहिलो तृप्त भावनेने, दिले तयाने सर्व काही ।
नामांतुनि तयाच्या मिळण्याची, येथे आहे ग्वाही,
चित्तीं वसतां तो, मिळायचे उरलेच नाही काही ।।

आणि मग सारं, सगळं पटतं अपुल्या मनालाही,
नसते हुरहुर अन् घोर या जिवालाही ।
ठरविण्याची काही, कधी आलीच नाही पाळी,
नव्हती स्मृतींतही अक्षरे ठरवलं होतं खूप काही ।।

-गुरुदास / सुरेश नाईक

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..