पुत्र कुपुत्र होईल पण माता कुमाता होणार नाही
वृद्धापकाळी आईवडिलांचा सांभाळ करणाऱ्या मुलांना व्यवसायानिमित्त त्यांच्या पासून दूर राहण्याची गरज पडते. वृद्ध आईवडिलांची खरोखरीच मुलांनी काळजी घेतली तर “वृद्धाश्रम” चालवण्याची गरजच भासणार नाही. पण अशी मुले किती? स्वतःची मुले घरापासून दूर राहत असली की आईवडील त्यांची काळजी करत असतात, “काय करत असेल माझे मूल? अनोळखी गावी कुठे राहत असेल?” अशी चिंता आईवडील करतच असतात. परंतु मुले स्वतःच्या आईवडिलांची काळजी करतात का? संत पुनित महाराजांनी तर असे म्हटले आहे की, “बाकी सगळे विसरा, पण आईवडिलांना विसरू नका”. […]