नवीन लेखन...

कथालेखक श्रीकृष्ण दामोदर पानवलकर

१९६० नंतरच्या काळात, आपल्या मोजक्या पण प्रभावी लेखनाने ज्या मराठी कथालेखकांनी कथालेखनाकडे लक्ष वेधून घेतले त्यात श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांची प्रामुख्याने गणना होते.

अर्धसत्य या सिनेमाचे मूळ कथालेखक  श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९२८ रोजी सांगली येथे झाला.

पानवलकर यांनी मुंबईच्या-कस्टम खात्यात २५ वर्षे अधिकारी म्हणून काम केले. तिथल्या रगेल, बहुरंगी जीवनाचे समर्थ चित्रण त्यांच्या ‘कांचन’ कथा संग्रहामध्ये दिसते. ‘कांचन’ हा त्यांच्या कथा संग्रहातील बहुसंख्य कथा कस्टमच्या वातावरणाशी निगडित आहेत. विमानतळ, बोटी, रेशीमउद्योग अशा त्यांच्या कार्यक्षेत्रातला त्यांचा अनुभव इथे शब्दांकित होतो. सोन्याच्या शोधासाठी चाललेले छापे, भ्रष्टाचारातून निर्माण होणारी लफडी, तिथे गुंतलेल्या माणसांचे राग, लोभ, हितसंबंध, हेवेदावे, विविध मानवी भाव यांचे अपूर्व दर्शन इथे घडते. स्वत:च्या अनुभवाला अनुकुल असे रूप घेणारी, जीवनाचे भेदक दर्शन घडवणारी, कधी रांगडी-रगेल, तर कोमल अनुभवाला अलगनारपणे उचलणारी पानवलकरांची चित्रदर्शी शैली, ‘कांचन’मध्ये ठाई ठाई भेटत राहते. हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या ‘अर्धसत्य’ या सिनेमाची मूळ कथा त्यांचीच होती आणि त्याबद्दल त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या ‘औदुंबर’, ‘सूर्य’ व ‘चिनाब’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता. शूटिंग, एका नृत्याचा जन्म, जांभूळ, गजगा, अशी त्यांची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांचे १९ ऑगस्ट १९८५ रोजी निधन झाले.

श्रीकृष्ण दामोदर पानवलकर यांच्या अधिक माहितीसाठी ब्लॉग.

http://sdpanvalkar.blogspot.in/?m=1

-संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4231 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..