नवीन लेखन...

सिद्धहस्त लेखक अशोक शेवडे

सिद्धहस्त लेखक अशोक शेवडे यांचा जन्म २४ जानेवारी १९४४ रोजी झाला.

अशोक शेवडे यांचा साहित्य, शिक्षण, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट जनसंपर्क होता या सर्वांपेक्षा सुद्धा प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध जोडणारे, माणुसकीच्या नात्याने वागणारे संयमी, सुहास्यवदन, संवेदनाशील सौजन्याने ओतप्रोत भरलेले व्यक्तिमत्व होते. कायम झब्बा घातलेले अशोक शेवडे यांची एक सिद्धहस्त लेखक, अतिशय सृजनशील मुलाखतकार, उत्तम दिग्दर्शक आणि संयोजक अशी ओळख होती.

अशोक शेवडे यांची अनेक वर्षांची चित्रपट-नाट्यक्षेत्रातील झपाटलेली पत्रकारिता होती. नियतकालिके व अन्य प्रसार माध्यमांमधून चित्रपट व कलाकारांविषयी सातत्याने लेखन करणाऱ्या अशोक शेवडे यांची पाच हजार मुलाखतींचा बादशहा अशी ख्याती होती. देशभरातील नामवंत साहित्यिक, तसेच चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी यांसह शिक्षक यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील दिगगजांच्या मुलाखती शेवडे यांनी घेतल्या होत्या.

जुन्या काळी दूरदर्शनवर दर शुक्रवारी त्यांची विशेष व्यक्तिमत्व सोबत मुलाखत कार्यक्रम होत असे. अशोक शेवडे यांनी मुंबई दूरदर्शनवर वीस वर्षात गजरा, रूपेरी, मुखवटे आणि चेहरे,नाट्यावलोकन, रंगतरंग असे ३०० हून अधिक कार्यक्रम केले होते. स्टेट बँकेतुन त्यांनी व्हीआरएस घेऊन नंतर पूर्णपणे मुलाखत घेण्यासाठी स्वतःला झोकून दिले होते.

अशोक शेवडे यांनी उठ मर्दा कोंबडं आरवलंय हे लोकनाट्य लिहिले होते. या नाटकाचे दिग्दर्शक होते दिलीप कोल्हटकर, या लोकनाट्यच्या निर्मात्या माया जाधव होत्या. तसेच अशोक शेवडे यांनी पण लक्षात कोण घेतो? या दूरदर्शन नाटिकेचे लेखन-दिग्दर्शन केले होते. मार्मिक चित्रानंद या मासिकांसाठी ते कायम लिहीत असत. चंदेरी सोनेरी बोल्ड…..बिनधास्त हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. अशोक रघुनाथ कुळकर्णी या भन्नाट व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास मांडणारे ‘अवलिया’ हे पुस्तक अशोक शेवडे यांनी लिहिले होते.

अशोक शेवडे यांनी अनेक जाहिरातपट-माहितीपटांचे दिग्दर्शन केले. अशोक शेवडे यांची निर्मिती सूर तेच छेडिता (वाद्यवृंद ) व चंदेरी सोनेरी (आठवणीचा कार्यक्रम) हे कार्यक्रम महाराष्ट्रात लोकप्रिय झाले होते.

अशोक शेवडे यांचे १८ मार्च २०२० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..