नवीन लेखन...

श्री आनंद लहरी – भाग १

भवानि स्तोतुं त्वां प्रभवति चतुर्भिनं वदनै: प्रजानामीशानस्त्रिपुरमथन: पंचभिरपि। न षड्भि: सेनानीर्दशशतमुखैरप्यहिपति- स्तदान्येषां केषां कथय कथमस्मिन्नवसर:।।१।।

जगज्जननी माॅ त्रिपुरसुंदरी आदिशक्तीचे स्तवन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य महाराज ज्या अपूर्व आनंदाचा अनुभव घेत आहेत त्या आधारे त्यांनी या स्तोत्राचे आनंदलहरी असेच नामकरण केले आहे.

आई जगदंबेचे स्तवन नेमके कसे करावे? हा त्यांच्यासमोर आलेला पहिला प्रश्न आहे. का पडला असावा हा प्रश्न? आचार्यश्रीच त्याचे उत्तर देतांना कारणमीमांसा करतात,

भवानि स्तोतुं त्वां प्रभवति चतुर्भिनं वदनै:- ते म्हणतात, आई ! तुझी स्तुती करण्यास भगवान श्री ब्रह्मदेव देखील समर्थ नाहीत. हे सांगताना आचार्य श्रीनी मुद्दाम ब्रह्मदेवांच्या चार मुखांचे वर्णन केले. चार वदनांनी त्यांनाही संभव नाही. मग सामान्यांची काय दशा? असा त्यामागील भाव आहे.

पुढे ही मुखसंख्या आणखीन वाढवत आचार्यश्री म्हणतात,

‘प्रजानामीशानस्त्रिपुरमथन: पंचभिरपि ‘चार मुखांचे ब्रह्मदेव नव्हे तर सकल प्रजेचे अधिपती असणारे, त्रिपुरासुराचा विनाश करणारे, पंचमुखधारी भगवान शंकर देखील असमर्थ आहेत.

न षड्भि: सेनानी- हे दोघेच नाही तर सहा मुख असणारे सेनानी अर्थात देवसेनापती भगवान षडानन स्कंद, कार्तिकेय देखील तुझ्या गुणगानात हतबल आहेत. इतकेच काय तर, दशशतमुखैरप्यहिपति – दश शत अर्थात हजार मुखांनी युक्त असणारे अहिपती अर्थात भगवान शेष आपल्या हजार मुखांनी आणि दोन हजार जिभांनी, आई जगदंबेच्या वैभवाचे गुणगान करण्यास असमर्थ आहे.

तदान्येषां केषां कथय कथमस्मिन्नवसर: ! मग इतर कोणाला याबाबतीत अवसरच कुठे आहे? अर्थात इतर कोणाला ते जमेल कसे? असे म्हणून आचार्य श्री आई जगदंबेला शरण जात आहेत.

तुझ्या गुणवर्णनासाठी तूच शक्ती दे अशी प्रार्थना करीत आहेत.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड 

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..