नवीन लेखन...

श्रावणमास

आला श्रावण मेघ नभातील दूर दूर चालले
येता हळुच सर मेघांमधूनी मी ईंद्रधनु पाहिले ।
कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ असे चालला
पाहूनी हिरवळ भासे कुणी शालू हिरवा तो नेसला ।
तुडुंब भरूनी नदी निघाली प्रिय सागर भेटीला
ओढ लागली मीलनाची आता दिसे न काही तिला ।
तरारली पिके शिवारी शेतकरी बहू हरखला
अती आनंदे त्यास पाहता मम जीव सुखावला ।
ऊन पावसाचा खेळ हे लक्षण श्रावण मासाचे
त्यास जोडून येती दिवस किती गोड आनंदाचे ।
माहेरवाशीण कुणी वाट पाहते या श्रावणमासाची
मंगळागौर अन् नागपंचमी ही पर्वणी माहेरपणाची ।
असाच श्रावण सदा बहरु दे माझीया हो अंगणी
पियासंगे मग गाईन सखे मी मंजुळ गोड गाणी ।

सुरेश काळे
सातारा
मो. 9860307752
दि. २ सप्टेंबर २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..