नवीन लेखन...

संवाद हीच अंतर्मनाची गरज

अलीकडच्या सोशल मिडीयाच्या आभासी जमान्यांत हे नेटवर्क खरंच नीट वर्क करत आहे का? असा नेहमी प्रश्न पडतो. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉटस् अॅप इत्यादींच्या माध्यमांतून आपण एकमेकांशी आणि एकाच वेळी अनेकांशी कनेक्टेड असतो खरे, पण परस्परांच्या दु:खात नाही तर सुखांत तरी आपण खरंच कनेक्ट होतो का? आपल्या व्यक्त होण्यांत काहीतरी कमी असल्याचं नाही का हो जाणवत? त्या कनेक्ट होण्यांत खरंच थेट संवादाचं सुख मिळतं का? ह्या माध्यमातून पुरावा निश्चितच मिळेल पण दुरावा वाढतोय यांत यत्किंचितही शंका नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या केवळ शारीरिक मूलभूत गरजा असतात, मात्र संवाद ही आपल्या अंतर्मनाची मूलभूत गरज असते.

“संवाद” म्हणजे नुसतं बोलणं नाही, तर विचारांचं आदानप्रदान, एकमेकांना भावनिक आणि मानसिक पातळीवर समजून घेणं. ह्या संवादांत दुसऱ्याचं बोलणं, विचार, मत समजण्यासाठी ऐकून घेणं जरुरीचं असतं. अनेकदा समजून घेण्यापेक्षा समजून सांगण्यासाठी आपण उतावीळ असतो. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते, तशीच दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा आपल्या अंतर्मनाची गरज असते, हे समजून घेणं आवश्यक असतं.

ह्या विचारांच्या देवाणघेवाणीमुळे आपल्या विचारांना नवा आयाम मिळतो, अर्थात वैचारिक प्रगल्भता वाढीस लागते, सृजनशीलतेला नवे पैलू पडत जातात, ज्ञानात भर पडत जाते. आपल्या व्यक्तिमत्त्वाचं आणि उणिवांचं स्वतःला मूल्यांकन करता येतं. आपलं मानसिक आरोग्य सद्रुढ रहातं, हे महत्वाचं आहे. संपन्न व्यक्तिमत्वासाठी निरोगी मन आवश्यक असतं आणि निरोगी मनासाठी संवादाची गरज असते.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

Email: vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..